देशात 24 तासात 37 हजार 724 नव्या रुग्णांची नोंद : दिवसभरात 648 मृत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात बुधवारी दिवसभरात 37 हजार 724 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 11 लाख 92 हजार 915 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 7 लाख 53 हजार 50 जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. देशात होणाऱया उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंगळवारी एका दिवसात तब्बल 28 हजार 472 इतक्या विक्रमी रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात जवळपास 4 लाख 11 हजार 133 इतके सक्रीय रुग्ण राहिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गेल्या 24 तासात 648 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या 28 हजार 732 एवढी झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत कोरोनाचे मोठय़ा प्रमाणात संक्रमण होत असून या राज्यात जास्त रुग्ण सापडत आहेत.
चाचण्यांनी घेतला वेग
देशात 21 जुलैपर्यंत 1 कोटी 47 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. यामध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या 3 लाख 43 हजार 243 चाचण्यांचाही समावेश आहे. भारत सध्या चाचण्यांमध्ये दुसऱया क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. देशभरात जलद प्रतिद्रव नमुना चाचण्यांची संख्या वाढली असल्यानेही प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसते. मात्र, बाधितांचे प्रमाण 5 टक्क्मयांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.