रत्नागिरी/ प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराचा निकाल जाहीर झाला आहे. पश्चिमेकडील पाच राज्यात रत्नागिरी शहराचा पहिला क्रमांक तर देशभरात दहावा क्रमांक आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज झालेल्या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात याची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची बाब असून स्वच्छता प्रेमी रत्नागिरीकर आणि सफाई कर्मचारी यांच्या योगदानामुळे हा पुरस्कार रत्नागिरी शहराला मिळाला असल्याचे मत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी व्यक्त केले आहे . कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाले.