बेंगळूर/प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तींशी झगडणाऱ्या कर्नाटकसाठी भाजपचे २५ खासदार केंद्र सरकारची मदत मिळवण्यात अपयशी ठरले आहे. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्यवाह अध्यक्ष ईश्वर खंद्रे यांनी हे खोचक वाक्यवाय केलं आहे.
खंद्रे यांनी राज्यातील 56 तहसीलमधील ८५० हून अधिक गावे नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात आहेत. उत्तर कर्नाटकातील ५ जिल्ह्यात ३ हजाराहून अधिक घरे खराब झाली आहेत. ३,५०० किमी रस्ते आणि ७८० तलाव खराब झाले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही ठिकाणी मदत व बचाव कार्यात अपयशी ठरले आहे.
मागील वर्षी राज्यातील २२ जिल्ह्यांत पावसामुळे नुकसान झाले होते. परंतु राज्य सरकारने त्यापासून कोणताही धडा घेतला नाही. हवामान खात्याच्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासन मदत व बचाव कार्यात अपयशी ठरले आहे.
निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याचा उपदेश करणाऱ्या भाजप नेत्यांकडे केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही राज्यावर अन्याय का होत आहे या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.