प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्णसौध परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महषी वाल्मिकी, कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आणि जगज्योती बसवेश्वर यांचे पुतळे उभे करावेत, अशी मागणी अनुसूचित जमाती वाल्मिकी नोकर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांनी इंग्रजांच्याबरोबर लढाई लढली आहे. त्याचबरोबर महषी वाल्मिकी यांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. जगज्योती बसवेश्वर यांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. अशा या थोर व्यक्तींचे पुतळे सुवर्णविधानसौध परिसरात उभे करणे गरजेचे आहे. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करून तातडीने या परिसरात या सर्व पुतळय़ांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नागराज गुडय़ापगोळ, बसवराज नाईक, संतोष हलगेकर, मल्लेश देशनूर, गिरीश नागण्णावर, आनंद गुडय़ाप्पगोळ आदी उपस्थित होते.