व्यापाऱयांची आज पुन्हा बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
देशात आणि राज्यात तसेच बेळगावात कोरोना रुग्ण वाढण्याच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहर, उपनगरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिक स्वयंस्फुर्तीने बंद करण्याचा विचार करु लागले आहेत. याबाबत अनगोळमध्ये बैठक घेवून त्यामध्ये अनेकांनी याबाबत विचार व्यक्त केले. मात्र ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले. याच धर्तीवर अनगोळमध्ये जनता कर्फ्युचा विचार अनगोळमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अनगोळ उपनगरांमध्ये गेल्या महिन्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. काही जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला तर काही जणांना उपचार मिळाले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत विचारविनीमय करण्यासाठी आदिनाथ भवन येथे शनिवारी गावातील ज्ये÷ पंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी निधन झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. अनगोळ भागात मध्यमवर्गीय कुटुंब अधिक आहेत. दररोज हाताच्या पोटावर कुटुंब चालविणारे अनेक जण आहेत. याचा विचार होणे गरजेचे आहे. याबाबत विचार विनीमय करुनच निर्णय घ्यावा, असे विचार या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले. मध्यंतरी तीन महिन्याचा लॉकडाऊन झाला. त्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. सध्या कामधंदे नाहीत. त्याचा विचारही करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अनगोळ परिसरातील दवाखाने कायम खुले ठेवून जनतेला सेवा द्यावी, असे आवाहन डॉक्टरांना करण्यात आले आहे. लॉकडाऊनपेक्षा आपण दक्षता घेणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, सामाजिक अंतर ठेवणे गर्दी करायची नाही. काम असेल तरच घरातून बाहेर पडायचे. सॅनिटायझरचा वापर करावा, असे अनेकांनी यावेळी मांडले.
बैठकीला माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, किरण सायनाक, विनायक गुंजटकर, अनिल मुचंडीकर, राकेश पलंगे, राजू भेंडीगेरी, वसंत ताशिलदार, बाळू कदम, सुधीर भेंडीगेरी, प्रफुल्ल सोमनाचे, दीपक सोमनाचे, अरुण गावडे, लक्ष्मण देमजी, बी. एस. शिंदोळकर, ए. ए. मुल्ला, चंद्रकांत मुतगेकर, शंकर बिर्जे यांच्यासह ज्ये÷ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आज व्यापारी बंधुंची बैठक
शनिवारी पंचमंडळी तसेच ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता अनगोळ गावातील व्यापारी बांधवांची बैठक आदिनाथ भवनवाडा कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये विचारविनिमय करुन ठोस निर्णय घेतला जाणार आहे.