प्रतिनिधी/ बेळगाव
राजहंसगड (ता. बेळगाव) येथील नागरिकांनी केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने राजकारणाचा सच्चा नेता हरपल असून त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. राजकारणातील स्वच्छ आणि सात्विक चेहरा हरपल्याने आपल्याला दु:ख होत असल्याचे मत श्रीकांत थोरवत यांनी व्यक्त केले.
महादेव गल्ली, सिद्धेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. मंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जोतिबा थोरवत, कृष्णाजी मोरे, नानाजी लोखंडे, महादेव चव्हाण, लक्ष्मण पवार, नारायण हावळ, बसवंत पवार, बुद्धाजी अंगळे, कृष्णा यळेबैलकर, मारुती गडकरी, कृष्णा लोखंडे, परशराम अनगोळकर, राजू हावळ, गणपत नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.