मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन महामंडळाच्याच कर्मचाऱयांनी महामंडळाला लुटले
प्रतिनिधी / पणजी
आर्थिक विकास महामंडळ(ईडीसी) हे राज्यातील एकमेव महामंडळ आहे जे नफा करीत आहे. ईडीसीने आतापर्यंत 12 हजार पेक्षा अधिक लोकांना आधार देत त्यांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन केले. हीच त्यांची सर्वात मोठी उपलब्धी आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
ईडीसी येथे बुधवारी टास्क फोर्सच्या 100 व्या बैठकीनिमित्त मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या (सीएमआरवाय) लाभार्थीना मंजुरी पत्रक जारी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमेद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष संजय सातार्डेकर, व्यवस्थापकीय संचालक किरण बाळळीकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान मुख्यमंत्र्यांचे हस्ते काही सीएमआरवायच्या लाभार्थीना मंजुरी पत्रक देण्यात आले.
ईडीसीने आतापर्यंत अनेक दर्जेदार साधनसुविधा राज्यात उभारले आहेत. आज आपण जो पाटो प्लाझा पाहत आहोत ते ईडीसीमुळेच आहे. हे सर्व शक्य झाले कोर्पोरेशनच्या कर्मचाऱयांमुळे, त्यांच्या निस्वार्थ कामामुळे. त्यांचे देखील कौतुक केले पाहीजे. आता ईडीसीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करावे, त्यांनी गोव्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणांसाठी नविन योजना आणावी, यासाठी माझा नेहमी पाठींबा असणार आहे. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले
मुख्यमंत्री रोजगार योजना 2001 साली अस्तित्वात आली आहे. जवळपास 20 वर्षे ही योजना सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 220 कोटी वितरीत करण्यात आले. या योजनेचे 7355 लोकांनी लाभ घेतला आहे. तर मुदत कर्जच्या अंतर्गत 5 हजार जास्त लोकांना फायदा झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 12 हजार पेक्षा जास्त लोकांना ईडीसीने मदत केली आहे. अशी माहीती ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
महामंडळाच्याच कर्मचाऱयांनी महामंडळांना लुटलेः मुख्यमंत्री राज्यात अनेक महामंडळ आहेत जे तोटय़ात आहे. याचे मुळ कारण महामंडळाच्याच कर्मचाऱयांनी आपल्या महामंडळाला लुटले आहे. हे मला मुख्यमंत्री झाल्यानंतर कळत आहे. अनेक कर्मचाऱयांनी आपल्याच नावे अनेक जागा करुन घेतले आहे, किंवा आपल्या कुटूंबियातील कुणाला तरी जागा दिली आहे. त्यांनी कधीच सरकारचा किंवा आपल्या महामंडळाचा विचार केला नाही, त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.