प्रतिनिधी/ रत्नागिरी
आरोग्य सेवेतील रिक्त पदे तात्काळ भरा. सरळ थेट सेवा भरती करा. पोलिस वसाहतींची दुर्दशा थांबवा यासह इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.
समविचारी मंचच्या वतीने 15 ऑगष्ट पासून आरोग्य सेवेतील रिक्त कर्मचारी संख्या त्वरित भरावी, म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु आहे. त्याच विषयी शासनाकडून पाठपुरावा करण्यासाठी गुरूवारी हे उपोषण असल्याचे समविचारी मंचच्या वतीने सांगण्यात आले. या उपोषणात समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवा प्रमुख निलेश आखाडे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष डॉ सुजय लेले, साधना भावे आदिंनी सहभागी झाले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिह्यातील जिल्हा शासकीय रूपलय तसेच ग्रामीण रुग्णालयात विविध संवर्गाची आरोग्यपदे रिक्त आहेत. गेली 15 वर्षे मागणी करूनही ही पदे भरली जात नाहीत . करोना काळात यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे. कोरोना काळात उद्योग धंदा, रोजगार साधने बंद होती. तरी सामान्य माणसांनी वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज माहे मार्च पासून आजतागायत व्याज माफ करावे. जुन 2020 मध्ये कोकणात निसर्ग वादळ झाल . त्यावेळी रत्नागिरी जिह्यातील दापोली – मंडणगड येथे अपरिमीत आर्थिक हानी झाली. या विभागातील नुकसानी पंचनामे व्यवस्थितरित्या करुन संबंधितांना मदत मिळावी मदत केल्याची लाभार्थी यादी जाहीर करावी अशी मागणी आहे.
रत्नागिरी जिह्यात आज पर्यंत पिक विमा योजना गार्भीयाने विचारात घेतली जात नाही, तरी जिल्हा कृषी विभागाला याबाबतीतत आवश्यक ते आदेश व्हावेत. शहरातील कोव्हिड सेंटरना ऑक्सिजन पूरविणे. रिक्षा व्यवसायीकांना आर्थिक मदत मिळावी. भरमसाठ विद्युत बिल आकारणीची पडताळणी करण्यात यावी, आणि ही बिले कमी करावी. जिह्यातील पोलिस वसाहती मोडकळीस आलेल्या असून ऊन , वारा , पाऊस सोसत पोलिसांची कुटूंबे राहत आहेत, यातून पोलिस कुटुंबांना विशेषतः त्यांच्या मुला बाळांना अशी मोडकळीस आलेली घरे असुरक्षीत आहेत . तरी तातडीने पोलिस वसाहतींची नव्याने बांधणी व्हावी अशा मागण्यांचा समावेश होता.