नंदगड / वार्ताहर
गेल्या दोन दिवसापासून खानापूर तालुक्मयात आकाशात दिवसभर ढगाळ वातावरण व सायंकाळी पाऊस पडत आहे. सध्या भात पिके तरारून आली असून ती कापणीच्या हंगामात आहेत. मोठा पाऊस झाल्यास भाताची लोंबे तुटून भाताचे दाणे जमिनीवर पडल्यास मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आता काही दिवस पाऊस जाण्याची गरज आहे.
नंदगडसह खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात पीक तालुक्मयातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. खानापूर तालुक्मयातील नंदगड, बिडी, हलशी, हलगा, कापोली, लोंढा, गुंजी, शिरोली, नेरसा, रामगुरवाडी, बरंगाव, गर्लगुंजी, चापगाव, लालवाडी, बेकवाड, इटगी, गोधोळी, भुरूणकी, पारिश्वाड, गंदिगवाड, लोंढा, कक्केरी, जांबोटी, कणकुंबी, हेम्माडगा भागात भात पिक घेण्यात येते. जांबोटी, कणकुंबी, शिरोली वगळता अन्य सर्वच भागात भाताची पेरणी करण्यात येते तर जांबोटी, कणकुंबी, शिरोली भागात भाताची रोप लावणी केली जाते. यावषी कृषी खात्यातर्फे तालुक्मयातील 40 हजार हेक्टर जमिनीत भात लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यावषी 36 हजार हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे
मध्यंतरी काही दिवस पावसाने ओढ दिली होती. परंतु त्यानंतर पिकाला जेवढा अत्यावश्यक होता तेवढा पाऊस झाला. परिणामी पिकाची जोमाने वाढ झाली. सध्या कमी पाण्याच्या जमिनीतील म्हणजेच माळरानावरील भात पिके कापणीला आली आहेत. तर काही ठिकाणचे भात पिवळे होत आहे.
पानथळ जमिनीतील भात पिके, पूर्णपणे पोसावली असून ती पिवळी झाली आहेत. भात तरारून आले आहे. परंतु पाऊस गेले दोन दिवस तुरळक प्रमाणात पडत आहे. मोठा पाऊस झाल्यास भाताची लोंबे जमिनीवर गळून पडून शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे.