प्रहार संघटनेसह दानशूर मंडळींनी केली मदत
वादळी पावसाने विवाहासाठीचे साहित्य गेले होते वाहून
अश्रूपूर्ण नयनांनी आशीर्वाद दिले वधूवरांना
प्रतिनिधी / सातारा
हातावरच पोट जेव्हा दिवसभर राबल तेव्हाच पोटाला मिळतं. पोटाला चिमटा काढून तिन्ही लेकरांना फलटण तालुक्यातील कुरवली खुर्दचे संजय जाधव यांनी मोठं केलं. माहेश्वरी लहानपणापासून अंध असली तरी आपल्या मुलीच लग्न व्हावं अस प्रत्येक पित्याच स्वप्न असतं. दिसायला सुंदर असलेल्या माहेश्वरीचा विवाह ठरला. तिच्या विवाहाचे साहित्य आणले पण निसर्गाने घात केला. घरात पावसाचे पाणी शिरले अन् साहित्य वाहून गेले. दुःख पचवत ती ठरलेल्या मुहूर्तावर बोहल्यावर चढली. आईवडिलांनी वधूवरांना शुभाशिर्वाद दिले. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी वास्तववादी चित्रच फलटण तालुक्यात घडले. प्रहार जनशक्ती पक्षाने या कुटूंबाला मायेचा आधार दिला.
फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील संजय साहेबराव जाधव हे शेतमजूर. दुसऱ्याच्या शेतात राबायच. मोलमजुरी करायची अन आपलं कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी.मुलगी माहेश्वरी ही लहानपणापासून अंध पण हुशार. तिनं शिकावं म्हणून तिचे वडील खूप मेहनत घ्यायचं. आई संगिता सार काही करायची. तिने ब्रेल लिपीतून बारावीपर्यत शिक्षण घेतलं. वडिलांना भार नको म्हणून तिने शिक्षण सोडून दिले. अंध असल्याने विवाह होत नव्हता. पण एक स्थळ आले ते विंचुर्णी येथील नवनाथ गायकवाड याचे. अचानक विवाह ठरला.
लेकीच्या विवाहासाठी आईवडिलांनी असलेल्या पडक्या घराची भिंत बांधायला आणलेल साहित्य तसच ठेवून अगोदर लग्नाच साहित्य खरेदी केल. पण पावसानं घोळ केला. ओढ्याच चार फूट पाणी घरात शिरल. लेकीच्या संसाराच आणि घरातल साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं. मुहूर्त जवळ येत होता. आईवडिलांना लेकीच्या लग्नाची चिंता होती. ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली अन मदतीला धावले. अंध असलेल्या माहेश्वरीचा विवाह मुहूर्तावर पार पडला. शुभाशीर्वाद द्यायला प्रहारचे पदाधिकारी शंभूराज खलाटे, नातेवाईक उपस्थित होते. ढळत्या अश्रूपूर्ण नयनांनी आशीर्वाद दिले.