आकाशदिवे, पणत्या, विद्युतमाळा, रांगोळी बाजारात दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना जाईल आणि बेळगावच्या परंपरेला साजेशी दिवाळी साजरी होईल, या विश्वासाने शहरात दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. दिवाळी अद्याप 15 दिवसांवर असली तरी व्यापाऱयांनी दिवाळीसाठीचे साहित्य बाजारात दाखल केले आहे. सकारात्मक बाब म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांनी हळूहळू दिवाळीची खरेदी सुरू केली आहे. त्यांच्या तुलनेत अद्याप शहरातील खरेदीचे प्रमाण काहीसे कमी आहे.
दिवाळीची चाहुल देणारे आकाशदिवे, पणत्या, रांगोळी आणि रांगोळीचे रंग, विद्युतमाळा हे साहित्य सध्या प्रामुख्याने सर्वत्र दिसते आहे. दुकानांबाहेर आकाशकंदील टांगण्यात आले आहेत. आकाशकंदिलांमध्ये प्लास्टिक आणि कागद असे दोन नमुने उपलब्ध आहेत. कागदाचे पर्यावरणपूरक आकाशकंदील हे यंदाच्या दिवाळीचे वैशिष्टय़ आहे. साधारणतः दीडशेपासून साडेतीनशेपर्यंत आकाशकंदिलांचे दर आहेत.
यामध्ये पारंपरिक करंजीचे आकाशकंदील, त्यामध्येच एकावर एक असे दोन आकाशकंदील, शिवाय चांदण्या आदी नमुने उपलब्ध आहेत. कापडी आकाशकंदिलांचा नमुना प्रामुख्याने गोलाकार असून त्यामध्ये विविध रंग उपलब्ध आहेत. कागदी आकाशकंदिलांमध्ये कमळाची तसेच करंजीच्या आकाशकंदिलाची प्रतिकृती पहायला मिळत आहे. गतवषीच्या तुलनेत यंदा दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
बाजारपेठेत पारंपरिक पणत्या विक्रीस आल्या असून विशेष म्हणजे लहान आकारापासून मोठय़ा आकारापर्यंतच्या पणत्या आहेत. फॅन्सी पणत्या अद्याप दाखल झाल्या नाहीत. लहान पणत्यांचा दर 1 रुपया आहे. साधारण 2, 3, 5 व 10 रुपये दरात पणत्या मिळत आहेत. निरांजनाच्या आकारातील पणत्या हे यंदाच्या दिवाळीचे आकर्षण आहे.
रांगोळी आणि रांगोळीचे रंग दिवाळीत तेजीने खरेदी केले जातात. लक्ष्मी पूजनाला दुकानांसमोर आणि दिवाळीच्या पाच दिवसांत घरांसमोर मोठमोठय़ा रांगोळय़ा रेखाटल्या जात असल्याने रांगोळी आणि रंगांना मागणी आहे. अर्थात हे साहित्य विकणारे विपेते रस्त्यावरच विक्री करत आहेत. एकूणच दिवाळीची बाजारपेठ सजू लागली असून काही विपेत्यांना दिवाळी उल्हासात आणि पूर्वी इतक्मया उत्साहात साजरी होईल, असा विश्वास आहे. काही विपेत्यांना कोरोनाने अर्थचक्राला खीळ बसल्याने काटकसरीचा मंत्र जपत दिवाळी साजरी केली जाईल, असे वाटते.
शाम उपराणी
25 रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत आकाशकंदील विक्रीस आणले आहेत. 25 रुपयांचे आकाशकंदील हे कार्यालयात किंवा सजावटीसाठी वापरले जात असून त्यांचा आकार लहान आहे. दरामध्ये कोणतीच वाढ झालेली नसून दिवाळी उत्साहात साजरी होईल. बेळगावमध्ये आजपर्यंत दिवाळी नेहमीच उल्हासात आणि जल्लोषात साजरी होते. तीच परंपरा यंदाही असेल.
विनायक गुंजीकर
खानापूरहून पणत्या मागवत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. पणत्यांमध्ये विविध आकार असून त्यानुसार दर आहेत. मात्र कोरोनामुळे खिशात पुरेसे पैसे असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे प्रत्येक जण काटकसर करूनच दिवाळी साजरी करेल, असे वाटते.
राहुल उप्पीन
पूर्वीप्रमाणेच आकाशकंदील आणले असून त्यामध्ये वैविध्य आहे. पर्यावरणाला अलीकडे प्राधान्य मिळत असून यंदा कागदी आकाशकंदिलांना मागणी वाढेल, असा अंदाज आहे. कोरोना तोपर्यंत जाईल, अशी आशा आहे. यंदा चिनी बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती असणार नाही, असे दिसते आहे. मात्र, दिवाळी हा वर्षातील महत्त्वाचा सण असल्याने बेळगावकर तो उत्साहात साजरा करतील, त्यासाठी खरेदीमध्ये हयगय करणार नाहीत, असा विश्वास आहे.