विराट ट्रक्टर रॅलीतून दिला संदेश, राष्ट्रीय नेतृत्वाचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
मोदी सरकारने केलेल्या शेतकरी विधेयक विरोधातील टॅक्टर रॅलीचे कोल्हापुरातील आंदोलन यशस्वी झाले. हरियाणा, पंजाब नंतर या आंदोलनाची देशात चर्चा झाली. या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधलेच तर जिल्ह्यातील `काँग्रेसचे’ आपणच `सारथी’ आहोत. हा संदेशही यानिमित्ताने त्यांनी दिला. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची बांधलेली मोठ पक्षाला लाभदायी ठरणारी आहे. होवू घातलेल्या महापालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला नक्की फायदा होऊ शकतो.
पक्षासाठीचीराजकीयमहत्वाकांक्षा
केंद्र सरकारने वाणिज्य व्यापार, कत्राटी शेती आणि अत्यावश्यक वस्तू ही तीन विधेयके संसदेत मंजूर करुन घेतली. आमची मते विचार न घेतली नाहीत. असा आरोप करीत सर्वच विरोधी पक्षानी कडाडून विरोध केला. देशातील दोनशेच्या वर शेतकरी संघटनांनी या विरोधात एल्गार पुकारला. पंजाब, राजस्थान सरकारने ही विधेयके लागू करणार नाही असे ठणकावून सांगितले. याचे लोन महाराष्ट्रातही पसरले. गुरुवारी कोल्हापुरातून यांची ठिणगी पडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आंदोलनाची सर्व सुत्रे हातात ठेवत यशस्वी आंदोलन कसे करावे हे दाखवून दिले. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पाटील यांचे तोंडभरुन कौतुक केलेच तर शिक्षक, पदवीधरची एक जागा काँग्रेशकडे घ्यावी, निवडणूक आणण्याची जबाबदारी घेण्याचे वचन दिले. यातून त्यांनी पक्षासाठीची राजकीय महत्वाकांक्षीपणाही दाखवण्याचा प्रयत्न केला.
अडचणीच्या काळात पक्षाला उभारी देण्याचा
2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे त्यांचा पराभव झाला. जिल्ह्यातील काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला. पराभवानंतर अनेक कांग्रेस नेते अज्ञातवासात गेले. काहींनी भाजपची वाट धरली. मात्र मोजक्या नेत्यांपैकी सतेज पाटील यांनी काँग्रेसची फारकत न घेता नव्या जोमाने काम केले. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत लक्ष घातले, राष्ट्रवादीच्या मदतीने कोल्हापूर महालिकेवर सत्ता आणली. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात उभारी देण्याचा प्रयत्न केला. दक्षिण मधिल पराभवाचे उट्टे विधानपरिषद निवडणुकीत काढले. महादेवराव महाडिक यांच्यासारख्या तगडा उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करुन जिल्ह्यात अजून काँग्रेसचे अस्तित्व आहे, हे दाखवून दिले. तर लोकसभा निवडणुकीत आघाडी विरोधात उघड भूमिका घेत तितकाच कणखरपणही दाखवला विसरले नाहीत.
जिल्हाध्यक्षपदाची यशस्वी धुरा
राज्यात भाजपची सत्ता असल्याने अनेक नेते भाजपमध्ये गेले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्षाची साथ सोडली. मात्र ही संधी समजून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. चंदगड पासून शिरोळपर्यंत एक एक कार्यकर्ता जोडला. याचा विधनसभा निवडणुकीत काँग्रसला फायदाच झाला. पक्षाला जिल्ह्यात पुन्हा नंबर एकवर आणण्याचा त्यांचा इरादा विधानसभा निवडणुकीतच साध्य झाला. एका दमात पुतण्या ऋतुराज, उत्तरमधून चंद्रकांत जाधव, यांना मोठ्या फरकाने निवडणून आणले, तर अंतर्गत वाद बाजुला ठेवून पी. एन. पाटील यांनाही निवडणून आणण्यात वाटा उचलला. हातकणंगले मधून राजू बाबा आवळे यांच्या विजयातील अडथळे चानाक्षपणे दूर केले.
कोल्हापूर नंतर इचलकरंजी दोन नंबरचे शहर परंतु आवाडेंनी पक्ष सोडल्याने येथील काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. परंतु शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजिरे यांना आधार देत तुम्ही नसला तरी काँग्रेसचे अस्तित्व आहे हे आवाडेंना दाखवून दिले. एकाच वेळी अनेक जोडण्या लावत जिल्हÎात पक्षाचे नाव आघाडीवर ठेवले. याच बक्षीस म्हणून त्यांना गृह राज्यमंत्रीपदाबरोबर पालकमंत्रीपद देवून पक्षाने विश्वास दाखवला. पक्षाकडून मिळालेली संधी पक्षहीतासाठी वापरत जिल्ह्यातील काँग्रेस रिचार्ज केली आणि आपणच काँग्रेसचे सारथी आहेत. देश, राज्यातून आलेल्या नेत्यांच्या साक्षिने ट्रक्टर रॅलीच्या माध्यामातून दाखवून दिले.
2014 विधानसभा निवडणुकीत पराभव
2015 राष्ट्रवादीच्या मदतीने महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा
2015 विधान परिषद निवडणुकीत बाजी
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री
2019 काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची
2019 काँग्रेसचे चार आमदारांच्या विजयात वाटा
2020 उद्धव ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री पदी वर्णी
2020 पालकमंत्री पदाची पहिल्यांदा जबाबदारी