प्रतिनिधी / रत्नागिरी
हातखंबा गावातील पुलावर भीषण अपघात झाला असून साखर वाहतूक करणाऱ्या वाहनाने तब्बल चार वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात 6 जण जखमी तर एकजण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघात घडताच या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील पोहचले व त्यांनी जखमींना आपल्या गाडीने तात्काळ इस्पितळात पोहचवले. अपघात इतका भीषण होता की एका अपघातग्रस्ताच्या पायाचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला मुन्ना देसाई आणि सहकाऱ्यानी पकडून पोलिसांच्या हवाली केले.