परिसरात नागरिकांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
रघुनाथपेठ, अनगोळ येथील वाडा कंपाऊंड क्रॉसजवळ गेल्या चार दिवसांपासून पाण्याच्या पाईपला गळती सुरू असून रस्त्यावर सतत पाणी साचून राहत आहे. रात्रंदिवस पाणी वाया जात असताना त्याकडे महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले आहे. दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात असल्याने तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी अनगोळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या पाण्यामुळे रस्त्यादेखील खराब होत आहे. तर वाहने ये-जा करताना ते पाणी शिडत आहे. पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कारण पाण्याचा तुटवडा पडत असताना अशाप्रकारे पाणी वाया जात आहे. याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असून तातडीने ती गळती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे..