देशमुखनगर / वार्ताहर:
सातारा तालुक्यातील निसराळे अतित गावातील उरमोडी नदी पात्रपुर्ण कोरडे पडले असून या नदीवर बंधारे अडवून शेतीला पाणी दिले जाते अशीच व्यवस्था कृष्णा नदीवरसुध्दा आहे परंतु गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी हे बंधारे अडवणे गरजेचे होते. खोडद, निसराळे, अतित, माजगाव, नागठाणे, गणेशवाडी, पाडळी, बोरगाव, वळसे, डोळेगाव, वेचले, शेळकेवाडी, सोनगाव परिसरातील शेती ही कृष्णा तसेच उरमोडी नदी कँनाँलवर अवलंबून आहे.
पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या एका हंगामाचे वाटोळे झाले. अगोदरच एका मागुन एक येणाऱ्या संकटाना तोंड देताना बळीराजा पुरता हैराण झालेला आहे अश्यात लोकप्रतिनिधींचे अद्याप लक्षच नाही किंवा यांना जाणीवपूर्वक द्यायचे नाही हे समजत नाही. कारण सगळे व्यवस्थित झाले तर यांना कोण विचारणार आणि यातले नगदी पीक म्हणून ऊसाचे क्षेत्र भरपूर प्रमाणात आहे आणि सर्वांचे कारखाने खाजगी, सहकारी आहेत ऊसला वेळेत पाणी मिळाले तर थंडीत ऊस चांगले वजन देतो व शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यामुळे असेल बहुधा पण मग प्रशासन हे सुध्दा एकदम गप्प का? यांना पगार कमी झाला का ठेकेदार यांचे प्रेम कमी पडले हे ही समजायला तयार नाही पण यांच्या या खाबुगिरीमुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. यांना आम्ही जागृतपणे दरवर्षी पत्र देत असतो पण यावेळी कारभारी बदलला त्यामुळे यांनी हा शेतकऱ्यांचा प्रश्न फार गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याची ही अवस्था तर कॅनालची यापेक्षा गंभीर कॅनालला एकतर उशिरा आवर्तन सोडले. १७ नोव्हेंबरला सोडलेले पाणी अजुन शेवटपर्यंत २० दिवस झाले तरी पोहोचलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हंगाम वाया गेले हातातोंडाशी आलेली पिकाचे नुकसान झाले. फक्त शेतकर्यांची एकजुट नसल्याने व नेते फक्त राजकारण करत असल्याने या हंगामातील पाणी पट्टी माफ झाली पाहिजे व नुकसान झाले त्यांची भरपाई मिळाली पाहिजे अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा राजु शेळके जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिला आहे.