बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथे सुरु असणाऱ्या विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवसाच्या कार्यवाहीपूर्वी विधानसभेतील गांधी पुतळ्यासमोर कॉंग्रेस आमदार एकत्र येत त्यांनी देशभरातील शेतकरी गटांद्वारे पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत निदर्शने केली.
केंद्रसरकारने लागू केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान विधानसभेचे नेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात आमदारांनी काळे झेंडे आणि फलक लावून केंद्र आणि राज्य सरकारला शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायद्यातील दुरुस्ती मागे घ्या, अशी मागणी केली.