खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील सरकारी असलेल्या दोन रक्तपेढय़ांमध्ये रक्तघटक मिळत नाहीत तसेच तिथे रक्तघटक वेगळे करण्यासाठी लागणारी यंत्रणाही उपलब्ध नसल्याने याबाबत आपण तातडीने लक्ष घालून आरोग्य मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी मदत रक्ताची संघटनेने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱयांनी खासदार पाटील यांची भेट घेतली व त्यांची चर्चा केली व निवेदनही दिले. यावेळी कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. त्यातच जिह्यातील सरकारी दोन्ही रक्तपेढय़ांमध्ये रक्तघटक मिळत नाहीत व रक्तघटक वेगळे करणारी व्यवस्था अस्तित्वात नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी मदत रक्ताची संघटनेच्यावतीने खा. पाटील यांच्याकडे आली आहे. दरम्यान, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खा. पाटील यांनी यावेळी दिली.
गेले 9 महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातच रक्त न मिळणे ही मोठी समस्या आहे. त्यातच खासगी रक्तपेढय़ा मोठय़ा प्रमाणात तपासणीच्या नावाखाली लूट करत आहेत. अशातच सातारा जिह्यात असणाऱया दोन सरकारी रक्तपेढय़ामध्ये रक्तघटक मिळत नाहीत व रक्तघटक वेगळे करणारी व्यवस्था अस्तित्वात नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गरजूना रक्त मिळत नाही. याबाबत निवेदन देण्यात आले होते. यावेळी खासदार पाटील यांनी लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून रक्तघटक वेगळे करणारी व्यवस्था सुरु करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.