वार्ताहर/ मांजरी
शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून इंगळी येथील शेतकऱयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, इंगळी (ता. चिकोडी) येथील आनंद आप्पा इंगळे (वय 41) यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायासाठी गावातील संस्था व प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघातून सुमारे दहा लाख रुपये कर्ज काढले होते. गतवषी महापूर, यावषी अतिवृष्टी व कोरोनाच्या प्रभावामुळे शेतातील उत्पन्न कमी आल्यामुळे शेती व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे ही चिंता त्यांना सतावत होती. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असून पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणप्पा आरी हे अधिक तपास करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱयाच्या पत्नीने अंकली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.