शाळा परिसरातील नागरिकांचा विरोध : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ जोयडा
रामनगर (ता. जोयडा) च्या पूर्व भागात एक मात्र रेड्डी स्टोन क्रशर सुरु आहे. ते त्वरित बंद करावे अथवा सेफ झोनमध्ये स्थलांतरीत करावे, अशी मागणी मारुती गल्ली, अण्णा हजारे गल्ली व सीबीएससी स्कूल परिसरातील नागरिकांनी विरोध व्यक्त करत बंद करण्याची मागणी केली आहे. तर ता. पं. सदस्य शरद गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली 500 शेतकरी बांधवानी सर्वच स्टोन क्रशर व ब्लास्टिंग बंद करावे, अशी लिखीत मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
रेड्डी स्टोन क्रशर हे एक मात्र स्टोन क्रशर पूर्व भागात आहे. इतर सर्व स्टोन क्रशर व ब्लास्टिंग तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सेफझोनमध्ये सुरु आहे. पूर्व भागातील एक मात्र स्टोन क्रशर सतत स्टोन क्रशिंग करत असल्याने मोठय़ा प्रमाणात डस्ट हवेत उडत आहे. झाडावर, ओढय़ावर, नालावर, घरावर स्टोन यांची धुळ मोठय़ा प्रामणात पडत आहे. यामुळे ओढय़ाचे आणि तळ्याचे पाणी दुषित होत आहे. याचा सरळ दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. या भागातील नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. धुळ हवेत उडत असल्याने नागरिकांना अस्थमा व श्वासासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा सरळ परिणाम लहान मुलांवर व वृद्धांवर जास्त प्रमाणात होत असल्याचे तक्रारीत व्यक्त पे आहे.
सतत सुरु असलेल्या स्टोन क्रशरमुळे येथे जवळच असलेल्या अंतराष्ट्रीय सीबीएससी प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व विद्यालयाच्या विद्यार्थी वर्गावर आवाजाचा व धुळीचा परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांनी यापूर्वीच तक्रार नोंदविली आहे.
या स्टोन क्रशरच्या परिसरात शेकडो एकर शेतीमध्ये शेतकरी भात पिकवितात. दिवसा शेतकरी शेतात काम करताना हवेत उडत असलेली स्टोन क्रशरची धुळ या शेतकऱयांच्या अंगावर पडत आहे. पाळीव प्राण्यांना सुद्धा चरताना चाऱयाबरोबर धुळ सुद्धा खाली लागत आहे. शेतकरी संपूर्ण दिवस या क्षेत्रात काम करत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसत आहे. आरोग्य खालावत आहे. अस्थमा संबंधित रोगांची लागन या शेतकऱयांना होत आहे. हे एक मात्र पूर्व भागातील क्रशर बंद करा अथवा सेफ झोनमध्ये तरी हलवावे अशी जोरदार मागणी नागरिक, शेतकरी व विद्यार्थी वर्गातून केली आहे.
यावेळी ता. पं. सदस्य शरद गुर्जर बोलताना म्हणाले, आम्ही विस्थापिक नागरिक आहोत. रामनगर परिसरातील सर्वच स्टोन खाणी व क्रशर बंद करावे यासाठी 500 शेतकरी बांधवांनी लिखीत तक्रार जिल्हाधिकारी यांना मागील डिसेंबर महिन्यात दिले. जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे तमाम रामनगर जनतेचे लक्ष लागून राहे. जिल्हा प्रशासन दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयातुन यावर न्याय मागणार आहोत. या संबंधित सर्व पुरावे आम्ही जिल्हाधिकारी यांना दिले आहे. असे शरद गुर्जर यांनी व्यक्त केले.