प्रतिनिधी / पणजी
अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 50 हजार रुपये दंड आणि 4 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झालेल्या रायबंदर येथील कन्हैय्या नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे. सदर प्रकरण 2011 साली बरेच गाजले होते.
न्या. एम. एस जवळकर यांच्या खंडपीठाने सदर निवाडा ऍड. प्रशीन लोटलीकर यांनी सदर संशयित आरोपीच्या वतीने बाजू मांडली. दि. 16 ऑगस्ट 2017 रोजी बाल न्यायालयाने निवाडा देताना सदर संशयिताला बलात्कार केल्याप्रकरणी निर्दोष मुक्त केले होते. तसेच पुरावा नष्ट करणे कलम 342, 376, 201 खाली निर्दोष ठरविले होते मात्र कलम 354 खाली दोषी ठरविले होते.
दि. 29 डिसेंबर 2011 रोजी पेशाने चित्रकला शिक्षक असलेल्या या संशयित आरोपीने आपल्या एका नववीत शिकणाऱया 15 वर्षीय विद्यार्थीनीला घरी नेले तिथे तिला नवीन कपडे बदलायला देऊन तिचे मॉडलिंगसाठी फोटो काढले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिला घरी आणून सोडल्याचा आरोप होता.
सदर मुलगीने पोलिसात तक्रार दिलेली नाही तीच्या आई वडिलांनीही दिलेली नाही तर एन.जी.ओ निशा देसाई नामक महिलेची तक्रार पोलिसांत नोंदवून घेतली
सदर पिडीत मुलीने न्यायालयात संशयित आरोपी विरुद्ध कोणतीच साक्ष दिली नाही साक्ष देण्यापूर्वी दि. 27 जुलै 2012 रोजी तिने जाळून घेवून आत्महत्या केली
सदर पिडीत मुलीच्या बहिणीने न्यायालयात साक्ष दिली व संशयित आरोपी कनय्या नाईक निर्दोष असल्याचे सांगितले. आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खोटा आरोप करुन एन.जी.ओला घेऊन पोलिसात जाण्याची एक महिला या षडयंत्रामागे कारणीभूत आहे. साक्ष देणाऱया या बहिणीचे त्या कारस्थान रचणाऱया महिलेच्या मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. त्याच्यापासून त्याल मुलगाही झाला आहे. या दोन्ही बहिणी कनय्या नाईक यांच्या विद्यार्थीनी त्यांनी या सरांची मदत घेतली कनय्या नाईक यांनी दबाव आणल्यामुळे सदर कारस्थान रचणाऱया बाईने आपल्या मुलाशी लग्न लावून दिले व नंतर मुलाला विदेशात पाठवून सदर पिडीतेच्या या साक्ष देणाऱया बहिणीला घराबाहेर काढले. त्या मुलीच्या आईला साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले नाही. त्या मुलीच्या वडिलांची साक्ष झाली त्याप्रमाणे सदर संशयित आरोपी त्या मुलींच्या वडिलांकडे मान्यता मागायला आला होता तिला आपल्या घरी नेऊन तिचे मॉडेलिंगसाठी फोटो घेतो जेणे करुन एस.एस.सी नंतर तिला आपले करिअर निवडता येईल, असे त्याने म्हटले होते. पण त्या मुलीला प्रत्यक्ष घेऊन जाताना व परत आणून सोडताना त्यांनी पाहिले नाही असे त्याने म्हटले होते. विनयभंग केल्याचा कोणताच पुरावा नसताना बाल न्यायालयाने निर्दोषाला दोषी ठरवून 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावणे चुकीचे व अन्यायकारक असल्याची बाजू ऍड. लोटलीकर यांनी मांडली होती. खंडपीठाने सदर बाजू उचलून धरुन संशयित आरोपी कनय्या नाईक याला निर्दोष ठरविले आहे.