अमृत योजनेंतर्गत रस्त्याचे काम हाती : मागील वर्षी खोदलेला रस्ता व्यवस्थित नसताना पुन्हा खोदाई : ड्रेनेज वाहिनीचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी / बेळगाव
अमृत योजनेंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी कपिलेश्वर कॉलनीमधील रस्त्याची खोदाई दुसऱयांदा करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण आता कधी होणार, असा प्रश्न येथील रहिवासी करीत आहेत.
शहरातील डेनेज वाहिन्या खराब झाल्याने तसेच डेनेज वाहिन्या नसलेल्या भागात अमृत योजनेंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील वषीपासून हे काम सुरू असून, अद्यापही अपूर्ण आहे. संपूर्ण शहर आणि उपनगरात 47 कि. मी. अंतराची डेनेज वाहिनी घालण्यात येत आहे. यापैकी 42 कि. मी. अंतराची डेनेज वाहिनी घालण्यात आली असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी प्रमुख वाहिनी घालण्यासाठी प्रशासनाकडून तसेच सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम रखडले आहे. एसपीएम रोड ते जुना धारवाड रोडपर्यंतच्या कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर यापूर्वी डेनेज वाहिनी घालण्यात आली होती. त्यावेळी संपूर्ण रस्ता खोदण्यात आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पण त्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी संपूर्ण रस्ता खराब झाला असून, ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले होते.
मात्र, अलीकडेच आता पुन्हा दुसऱया बाजूने आणखी एक डेनेज वाहिनी घालण्यासाठी खोदाईचे काम करण्यात आले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत सांडपाणी नेण्यासाठी जुना धारवाड रोडच्या बाजूला डेनेज वाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी हे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे धारवाड रोड परिसरातील रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. जेसीबीने चर खोदण्याबरोबरच मोठय़ा पाईप घालण्यात आल्या. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यांसह हा रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याने रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत असताना आता पुन्हा खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे. या रस्त्यावरून जुना धारवाड रोडकडे ये-जा करणाऱया वाहनधारकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्याकरिता रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. पण मागील वषी खोदण्यात आलेला रस्ता अद्यापही व्यवस्थित करण्यात आला नाही. आता हा रस्ता कधी व्यवस्थित करणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.