प्रतिनिधी/ सातारा
शहरात काही ठिकाणी वारंवार पाणी गळती होत असते. गळती काढण्यासाठी चांगल्या रस्त्याची खुदाई करण्यात येते. नगरपालिका जुने प्रवेशद्वार ते माची पेठेकडे जाणाऱया रस्त्यावर ठिकठिकाणी खुदाई करण्यात आलेली आहे. गळती काढल्यानंतर त्याठिकाणी रस्त्याची योग्य डागडुजी न केल्यामुळे चांगल्या रस्त्यावर खड्डे पडुन ते खराब होत आहेत. गुळगुळीत रस्त्यावर अचानक खड्डा आल्याने वाहन चालवताना वाहनचालकांची कसरत होत आहे. गळती काढुन झाल्यावर खुदाई केलेल्या रस्त्याची नगरपालिकेने तातडीने दुरूस्ती करणे गरजेचे आहे.