प्रतिनिधी/ सातारा
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे स्वतः काल सायंकाळी रस्त्यावर उतरुन नागरिकांना आवाहन करत होते. त्याच बरोबर सोशल डिस्टन्स व नियम न पाळणाऱयांच्यावर कारवाई करत होते. त्यामुळे आणि लॉकडाऊनच्या भितीने दारुच्या दुकानासमोर पेदाडांची गर्दी दिसत होती. तसेच मटनच्या दुकानासमोर गर्दी सोशल डिस्टन्स ठेवून होती. तसेच मंगळवार तळे रोडवर जे विक्रेते बसतात त्यांच्यावर कारवाईचा धडाका पोलिसांनी केला होता. त्यामुळे भाजी विक्रेते व ग्राहक यांच्याकडे जर मास्क नसेल तर कारवाई होत असल्याने पोलीस आले पळापळा, असाच सुर सध्या साताऱयात उमटत आहे.
राज्यात अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तत्पूर्वी सातारा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वतः शनिवारी रस्त्यावर उतरुन साताराकरांना काही ठिकाणी गोडीगुलाबीत तर काही ठिकाणी रोकडय़ा भाषेत समजून सांगितले आहे. त्यांच्या सुचनेनुसार मोठय़ा प्रमाणावर नियम मोडणाऱयांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी साताऱयात चित्र वेगळे पहायला मिळाले. काही ठिकाणी तरी मास्कचा वापर दिसत नव्हता. परंतु दारुच्या दुकानासमोर सोशल डिस्टन्स पाळून नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच मटन, चिकन दुकानासमोर सोशल डिस्टन्स ठेवून गर्दी दिसत होती. राजवाडा परिसरातील मंगळवार तळे रोडवर मात्र विक्रेते अजूनही तसेच बसत होते. विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या सुचनेनुसार शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच इतर दुकानांचे शटर डाऊन रात्री आठलाच होत आहेत.
राजकीय कार्यक्रमांना नियमांची एwसीतैसी
जिह्यात अनेक ठिकाणी शोकसभा, बैठका होत आहेत. ज्या प्रमाणे बावधनच्या बगाडाप्रकरणी गावकऱयांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच गुन्हे शोकसभा घेणाऱया पुढाऱयांवर व त्यात सहभागी होणाऱया कार्यकर्त्यांवर का होत नाहीत. तसेच राजकीय पदाधिकाऱयांच्या बैठका होत आहेत. त्यालाही नियम वेगळे आहेत. काय?, असाही सवाल उपस्थित होत आहे.
जिह्यातील एका प्रांतांच्या घरासमोरच बिनामास्कचा निघाल होत वराड
जिह्यातील एका शहरात प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या निवासस्थानाच्यासमोरुनच गेल्या चार दिवसांपूर्वी घोडय़ावर बसून नवरा देवाला काढण्यात आला होता. कुरवल्या अन् कुरवले त्याच्यासमोर मास्क न घालता नाचत होते. त्यांच्यासमोर असलेले बॅण्डवालेही मास्क न घालता हा सगळा कार्यक्रम मंदिराजवळ पोहचला अन् परत फिरला. याबाबत स्थानिकांनी त्या तालुक्याच्या तहसीलदारांनाही माहिती दिली गेली होती. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.