ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील लोक लसीसाठी आक्रोश करत आहेत. परंतु, त्यांना लस मिळत नाही. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे राज्यात लसीकरण वाढवले पाहिजे. महाराष्ट्राला लस कमी पडत असेल तर पुण्यातून बाहेर जाणारी लस रोखण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना यांना याबाबत पत्र पाठवल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://fb.watch/4MaUbC63y6/
महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लसीचा महाराष्ट्रातच पुरवठा होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सिरम इन्स्टिट्युटला घेराव घालेल. एकही लस पुण्याबाहेर जावू दिली जाणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्सवप्रेमी आहेत. आता त्यांनी नव्या उत्सवाची घोषणा केली आहे. मात्र, लसच मिळणार नसेल तर त्याचा उत्सव कसला करता, असा सवालही शेट्टींनी केला आहे.