प्रतिनिधी/मिरज
सध्या राज्यात कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. हजारे लोक बाधित होत आहेत. यामध्ये शेकडोंच्या संख्येने गरीब रुग्ण आहेत. त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे अशा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी धर्मादाय रुग्णालय आणि राज्य शासनाने त्यांच्या उपचाराची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.
कोरोनाची महामारी नियंत्रणाबाहेर गेल्याने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना राबविणाऱ्या रुग्णालयांमध्ये यंत्रणा कमी पडत असल्याचेही शरद पाटील यांनी म्हटले आहे. राज्य शासनाने गरीब रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही प्रा. शरद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.