मधुमेह अथवा डायबिटिज या आजारापासून बचाव करण्यासाठी रोज कोणते ना कोणते उपाय समोर येतच असतात. यासाठी सातत्याने नवनवीन संशोधने केली जात आहेत.
- यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार फळांचा 100 टक्के शुद्ध रस प्यायल्यास टाईप-2 डायबिटिजचा धोका वाढत नसल्याचे समोर आले आहे.
- फळांच्या शुद्ध रसामुळे ‘फास्टिंग ब्लड ग्लुकोज’, ‘फास्टिंग ब्लड इन्सुलिन’ अथवा ‘इन्सुलिन’ प्रतिरोधक क्षमतेवर कोणताच प्रभाव पडत नाही.
- हा निष्कर्ष अमेरिकेतील ‘सेंटर फॉर केमिकल रेग्युलेशन अँड फूट सेफ्टी’च्या संशोधकांनी काढला आहे.
- फळांचा शुद्ध रस आणि ब्लड ग्लुकोज नियंत्रणासंबंधीच्या मूल्यांकनाच्या आधारावर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला. यामध्ये फळांचा रस व टाईप-2 मधुमेहाशी संबंध नसल्याचेच स्पष्ट झाले. असाच निष्कर्ष यापूर्वीच्या काही संशोधनांतून काढण्यात आला होता.
- या संशोधनामध्ये सफरचंद, द्राक्षे व अननस यासारख्या फळांच्या रसाचा प्रभाव तपासण्यासाठी डायबिटिजचा बायोमार्कर म्हणून ओळखल्या जाणार्या ‘फास्टिंग ब्लड ग्लुकोज’ आणि ‘फास्टिंग ब्लड इन्सुलिन’च्या स्तराची समीक्षा करण्यात आली. फळांचा शुद्ध रस घेतल्यास टाईप-2 डायबिटिस होण्याचा धोका वाढत नाही, हेच यातून सिद्ध झाले.