कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात मळभ आहे. जीवलगांच्या वियोगाचे दुःख आहे. उसवलेल्या समाज व्यवस्थेबाबत संवेदनशील मनांना ‘चाड’ असल्यामुळे ‘चीड’ आहे. सरकारी यंत्रणेमधील माणसे रात्रीचा दिवस करीत असली तरी ‘व्यवस्था’ म्हणून अपुरेपण आहे. आभाळच फाटत असल्यामुळे आता कोणत्याही एका व्यवस्थेचे प्रयत्न अपुरेच राहणार आहेत. सांप्रत काळात सार्वजनिक, खासगी आणि स्वयंसेवी क्षेत्रांनी एकत्रित येऊन समन्वयीत प्रयत्नांनी संकटांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. मोट कोणी बांधायची, पुढाकार कोणी घ्यायचा हा विदुरनीतीतील ‘योजकः तत्र दुर्लभः’ प्रश्न सनातन आणि अनिर्णीत आहे. कुणाच्याही पुढाकाराची वाट न पाहणारे, जसे जमेल, जेवढे झेपेल, प्रसंगी खिशास तोशीस लावून खारीचा वाटा उचलणारी असंख्य माणसे आज प्रकाशदिवे बनून स्निग्धपणे तेवत आहेत. काही घटना, काही प्रसंगांची उकल प्रातिनिधिक म्हणून मनाला उभारी देण्यासाठी. सारेच संपले आहे, या निराशेतून बाहेर येण्यासाठी.
घटना एकः देशभरातील इस्पितळांमध्ये झुंबड उडालेली आहे. संसाधने कमी आणि रुग्ण जास्त अशी परिस्थिती आहे. इस्पितळांमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजन न मिळण्याची परिस्थिती महाराष्ट्रातही आहे. अहमदनगर जिल्हय़ात अकोले हा तालुका आदिवासी संख्याबाहुल्याचा आहे. तालुक्मयासाठी फक्त 70 बेड आणि ती देखील ऑक्सिजनविरहित. तातडीच्या रुग्णांना 22 कि.मी.वरील संगमनेर वा 65 कि.मी.वरील नाशिकला हलवावे लागत असे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुक्मयातील प्राथमिक शिक्षक एकत्र आले. 1,100 प्राथमिक शिक्षकांनी त्यांच्या ‘अकोले तालुका शिक्षक समन्वय समिती’च्या माध्यमातून प्रत्येकी हजार रु. योगदानातून 11 लाख जमवले. प्राथमिक शिक्षकांचा पुढाकार पाहून माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, शासकीय कर्मचारी यांचेही योगदान एकत्रित झाले. कोरोना काळात ही शिक्षक मंडळी नाशिकला गेली. सर्जिकल साहित्य आणले. गाडय़ांमधील पलंग, गाद्या आदि सामान शिक्षकांनी स्वतः नाका-तोंडावरील मुखपट्टी सांभाळत उतरवले. जिल्हाधिकाऱयांची परवानगी मिळवून वापरात नसलेल्या एका आरोग्य केंद्रात 50 बेडचे रुग्णालय उभे राहिले. लगतच्या संगमनेर येथील ऑक्सिजन प्लँटमधून ऑक्सिजनच्या टाक्मया मिळवल्या. शिक्षकांचे संघटित प्रयत्न पाहून तालुक्मयाचे आमदार आणि धनिक व्यक्ती पुढे आल्या. अकोले तालुक्मयात लोकवर्गणीतून उभे राहिलेले 50 बेडचे ऑक्सिजन कोविड हॉस्पिटल 3 मे पासून वापरात आले आहे. प्राथमिक शाळा शिक्षकांचा हा आदर्श संघटित क्षेत्रातील सर्व सरकारी कर्मचाऱयांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कृतीत आणावा असा आहे.
घटना 2 ः घटना प्रस्तृत लेखकाच्या विद्यापीठातील. सदर विद्यापीठ ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक ऑनलाईन सेवांद्वारे येणाऱया गोष्टींचे वितरण माधवजी राजावत हे गृहस्थ करायचे. माधवजी जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हक्काचा माणूस. कोरोना काळात बाहेर जाणे-येणे ठप्प असल्यामुळे सर्वांची मदार माधवजींवर असायची. खऱया अर्थाने ‘कोरोना योद्धा’ असणारे माधवजी दुर्दैवाने कोरोनामुळेच दगावले. सर्वांनाच आपल्या घरातील माणूस गेल्याचे दुःख झाले. शिक्षकांनी ‘सहयोग स्व. माधवजी परिवार’ नावाचा व्हॉट्स-अप मेसेज विस्तारीत केला. दोन दिवसांत अडीच लाख रु. उभे राहिले. माधवजींच्या जाण्याचे दुःख आणि हानी भरून न येणारी आहे. आर्थिक मदतीपेक्षाही माधवजींनी जोडलेली माणसे आणि त्या माणसांनी बाळगलेले कृतिशील सामाजिक भान यामुळे त्यांच्या परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी मानसिक बळ मिळाले.
घटना तीनः निकोल फुटार्डो आणि टिना चेरियन या बेंगलोर शहरात राहणाऱया अवघ्या विशी-एकविशीतील तरुणी. निकोल, ‘सेंट जोसेफ’ महाविद्यालयात समाजकार्य पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला आहे. टिना, कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालय मणिपालमध्ये एम्बीबीएसच्या शेवटच्या वर्षाला आहे. कोरोना काळात जीव गमावलेल्या लोकांची मरणोत्तर अवहेलना पाहून या दोघी अस्वस्थ झाल्या. त्यांनी स्वतः पीपीई किट घालून गतप्राण झालेल्या जीवांना खांदा दिला. त्यांचा सन्मानजनक दफनविधी केला. एकेका दिवसात त्यांनी 5 ते 10 दफनविधी इतमानात पार पाडले. त्यांच्या कामाचा वृतांत वाचून, ऐकून, पाहून काही तरुणांची भीड चेपली. ते स्वयंस्फूर्तीने पुढे आले. आज बेंगलोरमध्ये ‘डिग्निफाईड फेअरवेल’ हा मृतकांचे क्रियाविधी करणारा तरुण-तरुणींचा गट प्रसिद्धीस पावला आहे. या स्वयंस्फूर्त कामाची सुरुवात करणाऱया निकोल आणि टिना या गटाचे समन्वयन करीत आहेत.
घटना चारः तामिळनाडूत कोईम्बतूर शहरामध्ये एक शिक्षक दाम्पत्य आपल्या एका परिचितांना भेटण्यासाठी तेथील शासकीय वैद्यकीय इस्पितळात गेले होते. 720 रुग्ण असलेल्या या इस्पितळात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीकृत वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. रुग्णांसाठी, त्यातही पीपीई किट घालून सेवा देणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांसाठी उकाडा असहय़ होता. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधि÷ातांनी लोकांना पंखे देण्याबाबत स्थानिक ‘एफएम’ वाहिनीवरून आवाहनही केले होते. या शिक्षक दाम्पत्याने अधि÷ाता एम्. रविंद्रन यांच्याकडे विचारणा करून पंखे पाठवीत आहोत, अशी माहिती दिली. इस्पितळात अपेक्षेहून अधिक आलेले शंभर पंखे पाहून अधि÷ातांनी दाम्पत्याकडे चौकशी केली. या दाम्पत्य आपले दागिने गहाण ठेवून 2 लाख 20 हजार रु.चे कर्ज केल्याचे अनुभवून अधि÷ाता हेलावून गेले. अधि÷ात्यांनी त्यांना फक्त 10 पंखे द्या. उर्वरित 90 कारखान्यास परत द्या. मी त्यांच्याशी बोलतो, असेही सांगून पाहिले. हे औदार्याचे प्रकरण अखेरीस तेथील जिल्हाधिकाऱयांपर्यंत पोहोचले. त्यांनी सर्व गोष्टींशी शहानिशा करून या दाम्पत्याच्या इच्छेचा मान राखत अधि÷ात्यांना मदत स्वीकारण्याबाबत सूचना केली. या शिक्षक दाम्पत्याने आपले नाव प्रकाशात येऊ न देण्याचा भारतीय संस्कार कटाक्षाने पाळला.
घटना पाचः कोरोना काळात अनेक ठिकाणी विशेषतः इस्पितळामध्ये वैद्यकीय वा मनोसामाजिक समाजकार्यकर्त्यांची वानवा अनुभवला आली. बडोदा शहरातील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील समाजकार्य विभागातील अनेक विद्यार्थी परिस्थितीची निकड ओळखून गेले अनेक महिने तेथील इस्पितळांसोबत प्रत्यक्ष काम करीत आहेत. कालच (24 मे 2021) या विद्यापीठामध्ये कोविड-19 बाबत उपचार आणि मदतसेवा संस्थांचे समन्वय साधणाऱया ‘सेतू’ या ‘एक थांबा मदत केंद्रा’चे उद्घाटन कुलगुरु प्रो. परिमल व्यास यांच्या हस्ते झालेले आहे. खरंतर घटना मदत करणाऱया व्यक्ती आणि संस्थाही अनेक आहेत. आशेची, प्रकाशाची बेटेही अनेक असतात. मोठा काळोख दूर करण्याचे सामर्थ्य कदाचित आपल्यामध्ये नसेल. स्वयंप्रकाशित होत, यथाशक्ती प्रकाशदिवे होऊन तेवत राहण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. शिक्षण संस्थांवर आणि शिक्षकांवर अधिक आहे.
डॉ. जगदीश जाधव