प्रतिनिधी / पणजी
येत्या 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यास सात वर्षे पूर्ण होत असल्याने या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने राज्यातील 191 ग्रामपंचायती क्षेत्रांमध्ये ‘सेवाही संघटन’ या अंतर्गत विशेष कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन केले आहे.
प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांन यांनी सांगितले की राज्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच 14 नगरपालिका आणि पणजी महापालिका तसेच जिल्हा पंचायत क्षेत्र यातील सर्व भाजपचे कार्यकर्ते सेवाही संघटन हा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. यामध्ये राज्यातील भाजपचे सर्व आमदार तसेच ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार नाहीत त्या ठिकाणी तेथील पदाधिकारी जाऊन या कार्यक्रमात सहभागी होतील. याअंतर्गत वाढत्या कोविडचा प्रभाव लक्षात घेऊन विशेष कार्यक्रम होणार नाहीत. परंतु, प्रत्येक पंचायत पातळीवर पाच ते सात भाजपचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी जाऊन कोविड संदर्भात शक्मय होईल तेवढी सामाजिक पद्धतीची सेवा करणार अहेत. कोविड बाधित, तसेच इतरांची देखील होईल तेवढी सेवा ते करणार आहेत असून दिवसभर हा कार्यक्रम रविवारी होणार आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तानावडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे पदाधिकारी यांची काल बुधवारी ऑनलाईन वेगवेगळय़ा बैठका घेण्यात आल्या. तानावडे हे सायंकाळी मडगावला गेले होते आणि तिथे दक्षिण गोव्यातील अनेक पदाधिकाऱयांबरोबर त्यांनी चर्चा केली.