प्रतिनिधी/ सातारा
कोरोना महामारीच्या काळात नियमित कचरा गोळा करणाऱया पालिकेच्या घंटागाडीवरील चालक व बिगाऱयांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार दिला गेला नाही. त्याच्या निषेधार्थ हुतात्मा स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, घंटागाडी चालकांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे निम्या शहरातील कचरा तसाच पडून राहिला होता. कचरा शहरातील राहू नये म्हणून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून भाग्योदीप या घंटागाडीचे चालक व बिगारी यांना वेतन दिले नाही. गेल्या तीन महिन्यापासून पगार दिला गेला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे निम्या शहरातील कचरा तसाच पडून राहिलेला आहे. दरम्यान, घंटागाडी चालक आणि बिगाऱयांनी निदर्शने केली. 30 बिगारी आणि 30 चालकांनी पगार तीन महिन्यापासून दिला गेला नाही. चालकास 9 हजार रुपये आहे एक हजार पीएफ कटींग केला जातो तर बिगाऱयास 8 हजार आहे तर एक हजार कटींग केला जातो. तोही खात्यावर दिला जात नाही. त्यामुळे आम्ही या कोरोना महामारीच्या काळात जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले.
दरम्यान, सदरबाजारमधील एका वॉर्डात नगरसेवक विशाल जाधव यांनी स्वतः ट्रक्टर लावून कचरा गोळा केला. त्यांनी मुख्याधिकाऱयांकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्याकडून नियमित ठेकेदारास महिन्याच्या महिन्याला बिल काढले जाते. कचरा शहरात कोठेही राहणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कोठेही कचरा राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.