नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा किंचित वाढल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 3 हजार 207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 31 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी एकाच दिवसात सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 01 हजार 875 कमी झाली असून आता ती 18 लाखांच्याही खाली आली आहे.
देशातील सक्रिय रुग्णसंख्या झपाटय़ाने घटत आहे. नव्या बाधितांमध्ये झालेली घट आणि वाढत चाललेल्या डिस्चार्जच्या आकडेवारीमुळे आता देशात 17 लाख 93 हजार 645 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.18 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 92 टक्के इतका आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत तर 35 कोटींहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 3 लाख 35 हजार 102 जणांचे बळी गेले आहेत. तर 2 कोटी 61 लाख 79 हजार 85 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे.
चाचण्या वाढल्या, बाधितांमध्ये घट
दर दिवशी रुग्णसंख्येत साधारणपणे लाखभर रुग्णांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील आठवडय़ाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घटत असल्याची अतिशय सकारात्मक बाब आहे. देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 92 टक्क्मयांवर पोहोचले असून, दर आठवडय़ाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.