त्वरित दुरुस्त करण्याची मागणी : रस्त्यावर पडलेल्या चरीही बुजवा
बेळगाव : विविध रस्त्यांचा विकास करून स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. मात्र अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, गोंधळी गल्ली रस्त्यावर भगदाड पडले आहे. कंग्राळगल्ली कॉर्नर जवळ रस्ता खचल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. ख•sमय रस्ते हीच स्मार्ट सिटी का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करून विकास करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत भागातील विविध रस्ते पूर्णपणे खराब झाले असून, प्रत्येक रस्त्यावर चरी निर्माण झाल्या आहेत. सन्मान हॉटेल ते समादेवी गल्लीला जोडणाऱ्या गोंधळी गल्लीच्या रस्त्यावर मोठा ख•ा निर्माण झाला आहे. कंग्राळ गल्ली कॉर्नरजवळ रस्ता खचल्याने हा ख•ा निर्माण झाला असून, वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. विशेषत: दुचाकी वाहनधारकांना अडचणीचे बनले असून, अपघात होण्याची शक्मयता अधिक आहे. या ठिकाणी रस्ता देखील अरूंद असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. परिसरात वाहने पार्क केली जातात. अशातच रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अनर्थ घडण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.