प्रतिनिधी / बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्याची पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चव्हाट गल्ली परिसराकडे जात आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना, वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. मंगळवारी दुपारपासून ही पाईप फुटली आहे. मात्र त्याची दुरुस्ती करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने इतर ठिकाणी पाईप फुटल्यानंतर दुरुस्ती होते की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Trending
- अदानी पोर्ट्सचा नफा 76 टक्क्यांनी वधारला
- मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
- राहुल गांधी रायबरेलीतून रिंगणात अमेठीमधून किशोरीलाल शर्मा
- 150 अब्जच्या कर्जासाठी ‘व्हीआय’ची बँकांसोबत चर्चा
- रॉयल चॅलेंजर्सचा मुकाबला आज गुजरात टायटन्सशी
- दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा
- सौदी अरेबिया सुंदरी घालणार विश्वाला गवसणी?
- स्वायटेक अंतिम फेरीत