बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्पः धोकादायक झाडे हटविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पडझड होऊ लागली आहे. शुक्रवारी रात्री बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलावानजीक झाड कोसळल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय रस्त्यावरील झाड हटविण्यास दिरंगाई झाल्याने वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. शनिवारी सकाळी झाड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलावापर्यंत दुतर्फा झाडे आहेत. याठिकाणी सातत्याने झाडांची पडझड होत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळी पोलिसांनी या मार्गावरील वाहनांना शिस्त लावली. तसेच कर्मचाऱयांनी फांद्या तोडून मार्ग खुला केला. मागील सहा महिन्यांत या ठिकाणी तीन झाडे कोसळली आहेत. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. मोठी झाडे उन्मळून पडत असल्याने वाहनधारक भीतीच्या छायेखालीच ये-जा करीत आहेत. दरवषी पावसाळय़ात या ठिकाणी झाडांची पडझड ठरलेली आहे. वादळी पावसाला सुरुवात झाली की, कमजोर झाडे कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे येथील झाडे वाहनधारकांसाठी धोक्मयाची ठरू लागली आहेत.
मार्गावर सातत्याने झाडांची पडझड
पावसाळय़ापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे हटविणे गरजेचे आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि वनखात्याच्या दुर्लक्षपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावर सातत्याने झाडांची पडझड होत असल्याने रस्ताच धोकादायक बनला आहे. या मार्गावर कोकणासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील वाहनधारकांची ये-जा असते. अलीकडे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत रस्ता अरुंद असल्याने सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच धोकादायक झाडे कोसळत असल्याने वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरील अरगन तलावानजीक असलेली काही झाडे अद्यापही धोकादायक स्थितीत आहेत. ती कधी कोसळतील याचा नेम नाही. त्यामुळे वनखात्याने सर्व्हे करून येथील धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.