Aadity Thackeray on Jalna Lathicharge : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत.आज आदित्य ठाकरे यांनीही निषेध करत सरकारवर हल्लाबोल केला. जालण्यातील प्रकार हा आरोप-प्रत्यारोपाचा विषय नाही. दुश्मनावर हल्ला करावा तसा लाठीचार्ज करायला लावलं आहे. एवढं सन्सेटीव्ह आंदोलन होत असताना याबाबत मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीचार्ज करतील हे अशक्य आहे. त्यामुळे लाज असेल तर खोके सरकारने राजीनामा द्यावी अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. बीडीडी चाळ येथे मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, शांततेत आंदोलन होत असताना लाठीचार्ज कसा झाला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना हे माहित असणार नाहीतर असे लाठीचार्ज होऊ शकत नाही. सरकारला लाज वाटायला हवी. हे सरकार नेमक कोणाचं आहे. जनरल डायरच आहे की महाराष्ट्र सरकारचं आहे, असाही सवाल त्यांनी केला. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी काम करत आहेत का?असाही सवाल त्यांनी केला.