अनेक जण जखमी
►वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामची राजधानी गुवाहाटी येथे एक भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. गुवाहाटीच्या जलुकबारी भागात रविवारी रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते दुर्घटनेत कमीतकमी 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
दुर्घटनेत 7 जण मृत्युमुखी पडले असून ते सर्वजण इंजिनियरिंगचे विद्यार्थी होते अशी माहिती गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी रस्ते दुर्घटनेबद्दल ट्विट केला आहे. जलुकबारी भागातील दुर्घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने अत्यंत दु:खी आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे आईवडिल अन् कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत प्रदान केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.