वायुदलाचे 3 अधिकारी बडतर्फ ः 9 मार्च रोजी घडली होती घटना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
9 मार्च रोजी भारताचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानातील मियां चन्नु शहरात कोसळले होते. चुकून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राप्रकरणी भारताने खेद व्यक्त करत चौकशीचे आश्वासन दिले होते. याप्रकरणी आता भारतीय वायुदलाने तीन अधिकाऱयांना बडतर्फ पेले आहे. केंद्र सरकारने या कारवाईचा आदेश त्वरित लागू देखील केला आहे. भविष्यात अशाप्रकारची घटना घडू नये म्हणून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
23 ऑगस्ट रोजी वायुदलाच्या संबंधित अधिकाऱयांना या आदेशाची माहिती देण्यात आली. व्हाईस ऍडमिरल आर. के. सिन्हा यांनी या प्रकरणाच्या तपासात एकाहून अधिक अधिकाऱयांना जबाबदार मानले होते.
भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात कोसळल्यावर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकत होतो, परंतु आम्ही संयम बाळगल्याचे उद्गार पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी काढले होते.
पाकिस्तानी सैन्याचे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हे क्षेपणास्त्र पाकिस्तानात कोसळल्याच्या दुसऱया दिवशी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली होती. भारताकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रावर वॉरहेड नव्हते, त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही असे त्यांनी सांगितले होते.
9 मार्च रोजी पाकिस्तानात कोसळलेले क्षेपणास्त्र सीमेपासून 124 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले होते. भारतातील सिरसा येथून हे क्षेपणास्त्र परीक्षणासाठी डागण्यात आले होते. या क्षेपणास्त्राने 7 मिनिटांमध्ये 261 किलोमीटरचा पल्ला गाठला होता.