Ajit Pawar News : कोल्हापूरची हद्दवाढ होणे हे खूप गरजेचे आहे.काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. सगळ्यांशी बोलून हा निर्णय पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. हद्दवाढ करण्याच्या विरोधात असणाऱ्यांनी देखील याला सहकार्य करणे गरजेचे आहे. पुढील 50 वर्षाचा विचार करून आपल्याला सर्व नियोजन करावे लागेल.हद्दवाडीला विरोध असणाऱ्यांचे सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत, हद्दवाढ संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. काल (ता.15) ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अजित पवार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला.ध्वजारोहणानंतर अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी कोल्हापूरची हद्दवाढ, महापालिका आयुक्त , काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर भाष्य केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा धरणाच्या (काळ्ळमावाडी धरण) गळतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती सुरू आहे. तसच महायुतीचे सरकार राज्यात गतिमान काम करत आहे.कोरोना काळात म्हणावी तशी काम करता आली नाहीत.कोल्हापुरात समाधानकारक पाऊस असला तरी राज्यातील अनेक भागात अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय.राज्यात 75 वर्षांवरील वृद्धांना एसटीने मोफत प्रवास आहे.60 ते 65 वर्षाच्या नागरिकांनी मी वृद्ध आहे म्हणून सवलत मागू नका, असेही ते म्हणाले.
गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त नाही, यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबईत गेल्यावर कोल्हापूर महानगरपालिकेला चांगला आयुक्त देतो.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल.काळम्मावाडी येथील दूधगंगा प्रकल्पाची गळती दोन वर्षात काढू.त्यासाठी 80 कोटीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
काळम्मावाडी धरण गळतीवर स्वतः लक्ष घालणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करू,असे आश्वासनही त्यांनी दिले.