शहरातील बसथांब्यांवरील परिस्थिती : महानगरपालिकेचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील स्मार्ट बसथांब्यांवर भटक्मया जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जनावरे बसथांब्यात आणि प्रवासी रस्त्यात असे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील बहुतांशी बसथांब्यांमध्ये भटक्मया जनावरांची संख्या वाढली असून बसथांब्यांमध्ये जनावरेच आसरा घेत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरातील धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल, न्यायालय आवार, यंदे खूट आदी ठिकाणी असलेल्या स्मार्ट बसथांब्यांमध्ये जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर रस्त्यावर थांबावे लागत आहे. शिवाय भटक्मया जनावरांमुळे बसथांब्यात अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. जनावरे बसथांब्यात आसरा घेत असल्याने प्रवाशांना रस्त्यात थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्मयता वर्तविली जात आहे. शिवाय जनावरे बसथांब्यात आसरा घेत असल्याने बसथांबे जनावरांसाठी की प्रवाशांसाठी? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
शहरात भटक्मया जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीबरोबर प्रवाशांनादेखील या भटक्मया जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. ऊन, पावसापासून संरक्षण व्हावे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बसथांब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र बसथांब्यांमध्ये जनावरेच आसरा घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मार्ट बसथांब्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटकी जनावरे बसथांब्यात आसरा घेत असल्याने त्या ठिकाणी मलमूत्र आणि शेण पडत आहे. परिणामी दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांना थांबणे असहय़ होत आहे.
स्मार्ट बसथांब्यात जनावरांचा वावर
शहरात ठिकठिकाणी विविध सुविधा पुरवून डिजिटल बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी भटक्मया जनावरांचा वावर अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बसथांब्यांच्या सौंदर्यालादेखील बाधा पोहोचत आहे. मनपाच्या निष्काळजीमुळे बसथांब्यांमध्ये जनावरांचा वावर वाढला आहे. महापालिकेने भटकी जनावरे पकडण्याची मोहीम राबवून जनावरांना गोशाळेत धाडावे, अशी मागणी प्रवाशांतून करण्यात येत आहे.
गैरसोय…
- बसथांब्यांमध्ये भटक्मया जनावरांच्या संख्येत वाढ
- जनावरेच आसरा घेत असल्याने प्रवाशांची गैरसोय
- मनपाने भटकी जनावरे पकडून गोशाळेत धाडावे