प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावात कोणत्याही आर्थिक संस्थेची भरभराट, उत्तरोत्तर प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी अनुभवी मार्गदर्शकांची गरज असते. या सोसायटीत संस्थापक नेताजी जाधव, चेअरमन प्रदीप शट्टीबाचे, ज्ये÷ संचालक जाधव गुरुजी आणि श्रीधर जाधव असे अनुभवी व निःस्वार्थपणे काम करणारे मार्गदर्शक असल्यामुळे श्री साईगणेश सोसायटी उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. पाच कोटी उलाढालीतून चालू आर्थिक वर्षात 3 टक्के नफा मिळविणे म्हणजे अभिमानाची बाब आहे. त्यामुळे ही सोसायटी सतत प्रगतीकडे वाटचाल करत राहील यात शंका नाही, असा विश्वास बेकर्स सोसायटीचे व्हा. चेअरमन राजाराम सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. श्री साईगणेश सोसायटीच्या वार्षिक सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रारंभी माजी संचालिका सीमा पाटील, सोसायटीचे मार्गदर्शक चिमण जाधव, पायोनियर बँकेचे संचालक रमेश शिंदे, सोसायटीचे हितचिंतक विजय भातकांडे आणि नवी गल्ली शहापूर येथील रमेश भोजण्णावर यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्रीधर (बापू) जाधव यांनी उपस्थित सभासदांचे आणि निमंत्रितांचे गुलाब देऊन स्वागत केले. यावेळी सल्लागार म्हणून नियुक्त झालेले संचालक संजय बैलूरकर यांचे चेअरमन प्रदीप शट्टीबाचे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जाधव गुरुजी यांनी राजाराम सूर्यवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रदीप शट्टीबाचे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
आर्थिक वर्षात झालेल्या महत्त्वाच्या फेरबदलांचा त्यांनी आढावा घेतला आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सेपेटरी सूरज लाड यांनी अहवाल वाचन करून पुढील अंदाजपत्रकाला आणि नफा विभागणीला तसेच 10 टक्के लाभांश देण्यास मान्यता देण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक-संचालिका, कर्मचारीवर्ग, पिग्मी कलेक्टर्स, नियमित सभासद आणि निमंत्रित अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक सुरेश पाटील यांनी केले. नितीन जाधव यांनी आभार मानले.