बेळगाव : अनगोळ येथील नाथ पै नगर येथील गटारी तुडुंब भरल्या आहेत. त्यामधील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून महापालिकेने तातडीने गटारी साफ कराव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. नाथ पै नगर परिसरात अलिकडेच रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच गटारी बांधण्यात आल्या. मात्र गटारीतील पाणी निचरा होण्यासाठी योग्य दिशा देण्यात आली नाही. त्यामुळे पाणी साचून राहत आहे. अनेक गटारींमध्ये कचरादेखील साचला आहे. काही ठिकाणी गटारी बुजल्या आहेत. तेव्हा तातडीने या गटारी साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटीमध्ये कचऱ्याची उचल तसेच गटारी साफ करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अनगोळ येथील या नगराकडे दुर्लक्ष होत आहे. पावसामुळे पाणी साचून आहे. तेव्हा तातडीने गटारी साफ कराव्यात आणि ही समस्या सोडवावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्येकडे महापालिका लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.
Previous Articleपन्हाळा तालुक्यात रविवारी शिवसेनेचे होऊ द्या चर्चा अभियान
Next Article मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांची जि. पं. समोर निदर्शने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.