ऑनलाईन टीम/तरुण भारत :
संगम स्थळ अलाहाबाद हे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा संगम झाला. इथे उजव्या बाजूने गंगा नदी आणि डावीकडून यमुना नदी आली आहे आणि असे मानले जाते की सरस्वती नदी गुप्त स्वरूपात येथे जमिनीखाली अस्तित्वात आहे. अशा प्रकारे ३ नद्यांचा संगम इथे झाला आहे.
माघ मेळ्यात तुम्ही इथे आलात, तेव्हा तुम्हाला इथल्या चारही बाजूंनी रेतीच्या शेतात बांधलेले शेड पाहायला मिळतात. संगमावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. येथे तुम्हाला यमुना नदीच्या काठावर अनेक बोटी पाहायला मिळतात. या बोटीतून तुम्ही संगमच्या ठिकाणी पोहोचू शकता.संगमवर पोहोचल्यावर तुम्हाला यमुना नदी आणि गंगा नदीच्या मध्ये असलेल्या बोटींची लांबलचक रांग पाहायला मिळते.
इथे तुम्हाला आणखी एक फरक पाहायला मिळेल तो म्हणजे गंगा नदीचे पाणी उथळ आहे. याचा अर्थ इथे तुम्ही स्नान करू शकता आणि दुसरे म्हणजे यमुना नदीचे पाणी, की जे खोल आहे. येथील बोटींची मनमोहक रांग आपले लक्ष वेधून घेते. त्रिवेणी संगम हे असे ठिकाण आहे की जेथे तुम्हाला आनंद मिळतोच त्यासोबत आत्मिक समाधान ही मिळते.