दहशतवादी संघटनांचे समर्थन पडले महागात : राज्य-राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांची नजर, प्रोफाईल फोटोचाही होऊ शकतो गैरवापर
प्रतिनिधी /बेळगाव
सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर हा नेहमी चर्चेचा विषय असतो. याचा वापर जितका चांगला आहे, गैरवापर तितकाच धोक्मयाचा आहे. हे अनेक प्रकरणांवरून अधोरेखित झाले आहे. सोशल मीडियावरील एक पोस्ट समाजात अशांतता निर्माण करू शकते. हेच माध्यम दहशतवादी कारवायांत गुंतलेल्यांनाही सोयीचे ठरू शकते.
गेल्या आठवडाभरात अल कायदा, आयएसआयएस आदी दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याच्या आरोपावरून कर्नाटकची राजधानी बेंगळूर येथे दोन तरुणांची धरपकड झाली आहे. या प्रकरणांचे धागेदोरे बेळगाव जिल्हय़ापर्यंतही पोहोचले आहेत. सध्या केंद्रीय व राज्य गुप्तचर यंत्रणा संशयितांची चौकशी करीत आहेत.
संशयितांच्या चौकशीत सोशल मीडियाचा गैरवापर कसा होतो? हे पुन्हा एकदा सामोरे आले आहे. अल कायदा व आयसीस या दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती करण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला जात आहे. भारतात मुस्लीम समाज धोक्मयात आहे, अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरवून त्यांना धार्मिक जिहादचे धडे दिले जात आहेत.
उपलब्ध माहितीवरून संपर्कासाठी ही तरुणाई फेसबुक, टेलिग्रामसारख्या माध्यमांचा वापर करत आहे. टेलिग्राममध्ये हायडर ईगल, बांगला हायडर, अफगाण ईगल नावाचे ग्रुप्स आहेत. या ग्रुपवर चर्चा होते. धार्मिक जिहादसाठी तरुणाईची डोकी भडकविली जातात. सध्या गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलीस दहशतवादासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱयांवर लक्ष ठेऊन आहेत.
यापूर्वी मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असोत किंवा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो, तपास यंत्रणा व एटीएसच्या पथकांनी तपासासाठी बेळगावला धडक दिली होती. त्यावेळी सोशल मीडियाचा वापर इतक्मया प्रमाणात नव्हता. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे व्यवस्थित जाळे विणणे शक्मय झाले आहे. त्याचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
रविवारी शिरगुप्पी येथील एका 22 वषीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. समाजविघातक शक्तींची पाठराखण केल्यामुळे एकूण चार तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यापैकी तिघा जणांची सुटका करण्यात आली असून एका तरुणाला अटक झाली आहे.
दहशतवाद्यांविषयीची सहानुभूती पडली महागात
उपलब्ध माहितीनुसार गुप्तचर विभागाने अटक केलेला तरुण तंत्रज्ञानात पारंगत होता. त्याचा थेट दहशतवादी संघटनांशी संबंध नसल्याचे सामोरे आले असले तरी दहशतवाद्यांविषयीची सहानुभूती त्याला महागात पडली आहे. बेळगावात यापूर्वी सीमीचे व्यवस्थित जाळे कार्यरत होते. सीमीच्या हस्तकांची धरपकडही झाली आहे. सध्या जसा बेंगळूरचा वापर ‘स्लीपर सेल’च्या रूपाने दहशतवादी करत आहेत, तसाच वापर याआधीपासून बेळगाव शहराचाही होत आहे.
फसवणूक करणारा जामतारा किंवा नोयडामध्ये बसलेला असतो. सावज मात्र बेळगाव शहरातील एखाद्या गल्लीतील असते. ठकसेन व सावज यांच्यातील अंतर हजारो मैलांचे असते. मात्र, तंत्रज्ञानाच्या जोरावर ते एक सेकंदाच्या अंतरावर आलेले आहे. ठकसेन क्षणार्धात सावजाला गाठतो. मात्र, या टोळीतील गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास पोलीस यंत्रणेला अनेक महिने लागतात, कारण याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगार स्वतःच्या बचावाचा मार्गही अवलंबत असतात.
व्हॉट्सऍप, फेसबुकवर स्वतःचे फोटो, स्टेटस किंवा डीपीला ठेवायचा मोह प्रत्येकाला होतो. हा मोह काही जणांना महागात पडतो आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी महांतेश मुडसे (वय 29) रा. नाईंग्लज, ता. चिकोडी याला अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने अनेक आंबटशौकिनांना फेसबुकच्या माध्यमातून सुमारे 20 लाख रुपयांना ठकविले आहे.
एम. स्नेहा या नावाने त्याने फेसबुकवर एक खोटे अकाउंट उघडले होते. या अकाउंटवरून तो प्रेण्डरिक्वेस्ट पाठवायचा. पलीकडील व्यक्तीने ती स्वीकारली तर याचा खेळ सुरू व्हायचा. थोडेसे चॅटिंग केल्यानंतर समोरची व्यक्ती आंबटशौकीन आहे हे लक्षात आले, की ‘आपण सध्या अडचणीत आहे. आपल्या बँक खात्यावर 15 ते 20 हजार रुपये पाठवा, नंतर माझा मोबाईल नंबर तुम्हाला पाठवतो’, असे तो सांगायचा. त्याच्यावर विश्वास ठेऊन अनेकांनी त्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसेही जमा केले आहेत.
प्रोफाईलवर चांगले फोटो ठेवणेही धोक्याचे
अशा व्यवहारांसाठीच महांतेशने वेगवेगळय़ा बँकांमध्ये खातीही उघडली होती. पीएसआय होण्याचे त्याचे स्वप्न होते. शारीरिक चाचणीतही उत्तीर्ण झाला होता. चैनीसाठी पैसे कमावण्यासाठी त्याने पत्करलेल्या सोशल मीडियाच्या दुरुपयोग प्रकरणामुळे त्याला अटक झाली आहे. अशा घटनांमुळे आपल्या प्रोफाईलवर चांगले फोटो ठेवणेही धोक्मयाचे बनले आहे. कारण कोणीही त्या फोटोचा गैरवापर करणार नाही, याची खात्री नाही.
सायबर क्राईम पोलीस ठाणे वाढविण्याची गरज
तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी फसवणूक, समाजविघातक कारवाया उघडकीस आणणे सामान्य पोलिसांना कठीण जाते. म्हणून सरकारने प्रत्येक जिल्हय़ात सायबर क्राईम विभाग सुरू केला आहे. या विभागाकडे सध्या असलेली तक्रारींची यादी लक्षात घेता सायबर क्राईम पोलीस ठाणे वाढविण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळय़ा पद्धतीने फसवणूक सुरू आहे.