नलिन नेगी कंपनीचे अंतरिम सीईओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत पे च्या सीईओ पदाचा सुहेली समीर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. मागील वर्षी भारत पे चे सह संस्थापक अशरीर ग्रोव्हर यांच्यासोबत अनबन यांच्यासोबत चर्चेत आले होते. ग्रोव्हर यांच्यावर आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर समीर हे फिनटेक कंपनीचे कामकाज पहात होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीने सांगितले, की 7 जानेवारी 2023 पासून सीईओ पदासह नवी रणनीती आखण्याची योजना तयार करण्यात येणार आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या सीएफओ नलिन नेगी यांना कंपनीचे अंतरिम सीईओ बनविले आहे, जे या बदलाच्या कालावधीत कंपनीचे कामकाज सुनिश्चित करणार आहेत.
या अगोदर कंपनीच्या तीन अन्य मोठय़ा अधिकाऱयांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये चीफ टेक्नॉलॉजी अधिकारी विजय अग्रवाल, पोस्ट पे चे प्रमुख नेहूल मल्होत्रा आणि लोन ऍण्ड कंझ्युमर प्रोडक्टचे प्रमुख रजत जैन यांनीही राजीनामा दिला आहे. यासोबतच कंपनीचे महसूल अधिकारी निशित शर्मा यांनी जूनमध्येच कंपनीला रामराम केले आहे.
वादात राहिलेले समीर
मागील काही आठवडे ग्रोव्हर यांनी समीर यांच्यावर काही खासगी हल्ले केले होते, यासह ग्रोव्हर आणि समीर आणखीन चर्चेत राहिले होते.