ऑनलाईन टीम/तरुण भारत
भीमा कोरेगाव प्रकरणी गेली अडीच वर्ष जेलमध्ये असलेले आयआयटीचे प्राध्यापक आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांची आज नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला होता.
दरम्यान, एल्गार परिषद (Elgar Parishad) आणि माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना अटक झाली होती. आज त्यांची तरुंगातून सुटका झाली आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन आनंद तेलतुंबडे हे नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा मध्यवर्ती कारागृहातून (Taloja Central Prison) आज बाहेर पडले. तेलतुंबडे यांना न्यायालयाने जामीन दिला होता. मात्र, त्याला आक्षेप घेणारी याचीका राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. जी न्यायालयाने फेटाळून लावली.
हे ही वाचा : राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; २६/११ हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन