भोगावती/प्रतिनिधी
गेल्या एक वर्षापासुन लांबणीवर पडलेल्या शाहूनगर परिते ता.करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला.राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डाँ.पी.एल.खंडागळे यांनी निवडणुक कार्यक्रमाची घोषणा केली.उद्या दि.२० जुनपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असुन दि.३० जुलैरोजी मतदान घेण्यात येईल.तर ३१जुलैला मतमोजणी होणार आहे.
भोगावती कारखान्याची निवडणुक गेल्या वर्षापासुन लांबली होती. सद्या ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निवडणुक होणार की नाही ?याबाबत संभ्रमावस्था होती.मात्र कारखाना प्रशासनाने निवडणुक प्राधिकरणाकडे आवश्यक माहीती पुरविली.त्यामुळे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डाँ.पी.एल.खंडागळे यांनी निवडणुक कार्यक्रमाची घोषणा केली.यासाठी निवडणुक निर्णय अधिकारीपदी निळकंठ करे यांची नियुक्ती केली आहे.
भोगावतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम असा आहे.
दि.२० ते २७ जुन उमेदवारी अर्ज दाखल करणे,दि.२९ जुन उमेदवारी अर्जाची छाननी,दि.३०जुन पात्र उमेवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करणे,दि.१४ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस,दि.१७ जुलै उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्हे वाटप,दि.३०जुलै रोजी सकाळी ८ ते सायं ५ पर्यत मतदान व दि ३१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बिद्री व आजरा साखर कारखाना निवडणूका लांबणीवर पडल्याने भोगावतीची निवडणूकही पुढे जाण्याची शक्यता होती.त्यामुळे निवांत असलेल्या सर्वांनाच आता अचानक धावपळ करायला लागणार आहे.निवडणूक प्रचारासाठी १३ दिवसांचा अवधी असुन ऐन पावसामध्ये रणधुमाळी उडणार आहे.त्यामुळे भोगावती परिसरातील सर्वच राजकीय पक्ष व गटातटाचे कार्यकर्त्ये आजपासून कामाला लागणार आहेत.