पंजाब राज्यातील पाच नद्यांपैकी एक बियास. विश्वामित्र क्षत्रिय होते पण तपाच्या जोरावर ब्रह्मषी बनले. त्यांच्या तपामुळे इंद्रपद जाईल या भितीमुळे त्यांचे तप नष्ट करण्यासाठी मेनकेला पृथ्वीवर पाठवले. तिला भुलून परत तपाचरण सुरू करून वैराग्ययुक्त ब्रह्म तेजाचे अधिकारी झाले. पण तरीही देव व मानव त्यांना ब्रह्मषी मानायला तयार नव्हते. वसि÷ ज्यावेळी तुला ब्रह्मषी मानतील तेव्हाच तू या पदाला पोचशील. विश्वामित्र चिडले. त्यांनी वसि÷ांची कामधेनु पळवली, त्याचे 100पुत्र मारले, आश्रम उध्वस्त केला. त्यांनी या नदीत उडी टाकली, त्यांच्या स्पर्शाने नदी पावन झाली. त्याचे सर्व पाश तुटले, ते पापमुक्त होउन वर आले. तेव्हापासून या नदीला विपाशा, पाशमुक्त करणारी नदी म्हणतात.
विपाशा, विशाला, महावेगा, विमला, व्यास अशी नावे आहेत. कुलूतील रोहतांग घाटाच्या दक्षिणेस उगम पावून मनालीकडे वाहत जाते. चक्का व बेस या तिच्या उपनद्या आहेत.
झेलम….वितस्ता…-शंकराला भस्म लावलेलं, अन गळय़ात सर्प माळ घातलेली पाहून एक अप्सरा कुत्सीतपणे हसत होती. अशा या देवासाठी पार्वती तप करतेय हे आठवत परत परत हसत होती. पार्वतीच्या हे लक्षात आले आणि तिने शाप दिला, हिमालयाच्या पश्चिमेला वाळूचा समुद्र होऊन पडशील. अप्सरा घाबरली. तिने पाय धरले ऊःशाप मिळाला, तुला शिवभक्ताचा पाय लागला तरच तुझा उद्धार होईल. खूप दिवस झाले पण तसे घडत नव्हते, तिने पुन्हा पार्वतीची आराधना केली. पाषाणातून आश्रू वहायला लागले. पाषाणाची रेती झाली. तिचे प्रचंड ढीग तयार झाले. काश्मीर मधला ललितादित्य नावाचा पराक्रमी राजा दक्षिणेकडे स्वारीवर निघाला होता. एवढय़ात एक माणूस येऊन राजाला म्हणाला, तुला पश्चिमेचे वाळवंट ओलांडता येत नाही. अन् तू कसला पराक्रम करणार. राजाला राग आला. तो निघाला. या वाळवंटाकडे मजल दरमजल करत निघाला. दिवसा उन, रात्री कडाक्मयाची थंडी, तापलेली वाळू, सैन्याचे अन्न पाणी संपले, धड मागे जाता येईना अन पुढेही नाही. राजाने शंकराचे स्मरण करत आपल्या हातातले खड्ग जोरात वाळवंटात खूपसले अन् तेथून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. त्या गृहस्थाच्या जागी पार्वती प्रकटली, राजाने लोटांगण घातले. शिवभक्ताचे पाय लागले, अप्सरेचे अश्रू या नदीरूपात वाहू लागले म्हणून वितस्ता व नंतर झेलम म्हणू लागले.
ब्रह्मपुत्रा……आसाम मधली महानदी. हिच्या पात्रात एक प्रचंड बेट निर्माण झाले ‘ मिचिली’ पर्वतावर ब्रह्म कुंडात उगम. दिबांग, सेसिरा, तिस्ता या ब्रह्म पुत्रेच्या उपनद्या. तिला पद्मा म्हणतात. प्रचंड गर्जना करत बंगालच्या उपसागरात उडी घेते म्हणून मेघना. गोलुंदो येथे गंगा ब्रह्मपुत्रेचा संगम
कथा….1) परशुरामाने ही पृथ्वी निःक्षत्रिय करेन अशी प्रतिज्ञा केली आणि संहाराला प्रारंभ केला. रक्ताने माखलेले परशु नदीत धुतल्याने पाणी लाल झाले म्हणून हला लोहित्या असे म्हणतात.