भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी घेतली आहे. कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवेंद्र धंगेकर यांनी आठराव्या फेरीअखेर निर्णायक आघाडी घेतली असून, त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. धंगेकर यांना आठराव्या फेरीअखेर 67,953 मतं मिळाली असून, 9200 मतांनी ते पुढे आहेत. दरम्यान, भाजपचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला असून, मविआच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. फेरीनिहाय त्यांची आघाडी वाढत आहे. भाजपला त्यांच्या हक्काच्या प्रभागातही मतदान झाले नसल्याची चर्चा आहे. कसब्यात मतमोजणीच्या दोन फेऱ्या बाकी असून, अठरा फेऱ्यांत धंगेकरांची आघाडी कायम असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला आहे. तसेच भाजप पदाधिकारी वृत्तवाहिन्यांना देत असलेल्या प्रतिक्रियांवरून पराभव स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.