ऑनलाईन टिम / मुंबई
बुधवारी गोवा काँग्रेसला त्यांचे आठ आमदार सत्ताधारी भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाल्याने मोठा धक्का बसला आहे. यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “भारत जोडो यात्रेच्या यशामुळेच” गोव्यात भाजपचे “ऑपरेशन किचड” जलद गतीने मार्गी लागले आहे.
आपल्या ट्विटमध्ये जयराम रमेश म्हणतात “भाजप चिंताग्रस्त झाला आहे. यात्रेला कमकुवत करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची वळवण्याचा आणि चुकीच्या माहितीचा डोस दिला जात आहे. आम्ही भाजपच्या या घाणेरड्या युक्त्यांवर मात नक्कीच करू” असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही गोव्यातील माजी आठ आमदारांच्या बाहेर पडल्याबद्दल भाजपवर टीकास्त्र सोडले. पक्षांतर करणाऱ्यांना संबोधित करताना खेरा म्हणाले की, “ज्यांच्यात दबावाला बळी न पडण्याची आणि भाजपच्या भीतीने न डगमगण्याची हिंमत आहे तेच काँग्रेस पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’चा भाग होऊ शकतात.” त्यांनी फुटलेल्या आमदारांना सावध केले की, भाजपमध्ये त्यांचा राजकिय प्रवास अडथळ्यांनी भरलेला असेल.