विद्यार्थी, शिक्षकांची पंचाईत
प्रतिनिधी /पणजी
दोन वर्षानंतर प्रत्यक्ष हजेरीत मुलांच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिक्षण खात्याकडून पुस्तके मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. काही जणांनी इतरांची पुस्तके घेतली असून ते विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. शिक्षकांची देखील पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे.
समग्र शिक्षा अभियानतफ्xढ पुस्तकांचे वितरण शाळेत करण्यात येते. मात्र कोरोना संकटामुळे दोन वर्षे शाळेत शिकवणी नव्हती तर केवळ ऑनलाईन शिकवणी करण्यात आली. आता पुन्हा शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष प्रत्यक्ष हजेरीत सुरू होणार की नाही याबाबत खात्री नसल्याने पुस्तके मागविण्यात आली नसावीत असा सूर विद्यार्थी व शिक्षकांत उमटत आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही चालूच असून आता तो पुन्हा वाढत आहे. अशा परिस्थितीत मुलांसाठी पुस्तके मागवावीत की नको ? असा प्रश्न शिक्षण खात्यासमोर होता. आता शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना सध्या पुस्तकाविना शिकावे लागत असून ती केव्हा मिळतील याची खात्री कोणच देउढ शकत नाही अशी परिस्थिती आहे.
सरकारी शाळेतील प्राथमिक विभागातील मुलांना रेनकोट, वह्या देण्यात येतात. त्याचाही पत्ता नाही, असे समोर आले आहे. सरकारतफ्xढ पुस्तके देण्यात येत असल्याने बाहेर बाजारातही ती पुस्तके उपलब्ध नाहीत. कोणी दुकानदार ती पुस्तके विक्रीसाठी ठेवत नसल्याचे सांगण्यात आले.