अनेक ठिकाणी होतेय फसवणूक : कृषी खाते अथवा खाजगी कंपन्यांकडून बियाणे घेणे महत्त्वाचे
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाने बऱयापैकी हजेरी लावली आहे. त्यामुळे आता शेतकरी मशागतीच्या कामाकडे वळू लागला आहे. खरिपातील पेरणीपूर्वी नियोजनाचे काम सध्या सुरू आहे. पेरणीसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी शेतकऱयांनी बियाणांची निवड आणि खरेदी करताना घ्यावयाची काळजी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
आपण ज्या भागात उत्पादन घेतो तेथील स्थानिक वातावरणाला योग्य बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तशी शिफारस केलेली आणि शक्मयतो कृषी विद्यापीठे किवा त्यांच्याशी संलग्न असणाऱया संशोधन केंद्रात तयार झालेली बियाणे घेणे योग्य ठरते. कृषी खाते किवा इतर खाजगी कंपन्यांकडून बियाणे खरेदी करताना ती मान्यताप्राप्त आहेत की नाहीत तसेच ती योग्य संशोधन केंद्रामार्फत प्रमाणित झालेली आहेत का? हे योग्यवेळी न पाहिल्यास फसवणूक होण्याची शक्मयता अधिक असते. याकडे बळीराजाने लक्ष द्यायला हवे.
बियाणांबाबत अधिकाऱयांशी चर्चा करणे गरजेचे
शेतीचे सारे भवितव्य जसे निसर्गावर अवलंबून असते, तसेच ते योग्य प्रतिच्या बियाणांवरही असते. बरेचसे शेतकरी याचा विचार करत नाहीत. यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम मोठय़ा प्रमाणात जाणवतो. यामुळे पेरणीपूर्वीच योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बियाणांची खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बियाणांची निवड करताना ते चांगल्या प्रतिचे व प्रमाणित आहे की नाही, याची काळजी सर्वप्रथम घ्यावी. यासाठी शेतकऱयांनी गावोगावी उपलब्ध कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किवा तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकाऱयांशी चर्चा करणे आवश्यक आहे.
नामांकित प्रमाणित कंपन्यांमध्ये बियाणे खरेदी करा
या अधिकाऱयांची नेमणूक शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठीच सरकारने केलेली असते. बऱयाचवेळा शेतकरी भीड बाळगून अशा अधिकारी वर्गाकडे जाणे टाळतात. दरम्यान अशा अधिकाऱयांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास जिल्हा कृषी अधिकारी किवा जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागण्याचा अधिकार शेतकऱयांना आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱया बियाणांच्या सुधारित जातींची माहिती शेतकऱयांनी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठे, बियाणे निर्मितीसाठीची महामंडळे किवा खाजगी पातळीवर नामांकित प्रमाणित कंपन्यांमध्ये बियाणे खरेदी करणे केव्हाही चांगले.
प्रत्येक बियाणांच्या पिशवीवर प्रमाणीकरण यंत्रणेने त्या बियाणाच्या गुणवत्तेविषयी माहिती देणारी खूण, चिठ्ठी किवा टॅग लावलेला असतो. बऱयाच शेतकऱयांना याची माहिती असत नाही. बियाणांचा बॉक्स असल्यास त्यावर छापील स्वरुपात ही माहिती दिलेली असते. ती माहिती योग्य व्यक्तीकडून तपासून घेणे आवश्यक असते. बियाणे खरेदी करताना हा टॅग अतिशय महत्त्वाचा असतो. बरेचसे जुने शेतकरी अशिक्षित वर्गात मोडतात. किमान बियाणे खरेदी करताना सोबतीला एखाद्या शिक्षित माणसाला घेऊन सजगता बाळगल्यास नुकसान होत नाही.
बियाणांच्या वेष्टणांवरील टॅग पाहणे आवश्यक
दरम्यान बियाणांची खरेदी परवानाधारक विपेत्यांकडून केल्यास फसवणूक होत नाही. बऱयाचदा चांगली बियाणे अशी जाहिरातबाजी करून शेतकऱयांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. या कंपन्या आणि त्यांची बियाणे प्रमाणित नसतात. यामुळे शेतकरी वर्गाला नाहक तोटा सहन करावा लागतो. बियाणांच्या वेष्टणांवरील टॅग किंवा छापील माहितीवर बियाणे कोणत्या पिकाचे आणि जातीचे आहे याची माहिती दिलेली असते. बियाणाची उत्पादन क्षमता, ती तपासल्याची तारीख, कोणत्या तारखेपर्यंत ती वापरणे योग्य असतात त्याचीही माहिती असते. ज्याप्रमाणे औषधावर असलेल्या एक्स्पायरी डेटची पाहणी आपण काळजीपूर्वक करतो तशीच ती बियाणांच्या बाबतीत व्हायला हवी. हे शेतकऱयांनी ध्यानात घ्यायला हवे.
बियाणे कोणत्या प्रकारची आहेत, ती कोणत्या लॉटमधून आली आहेत, त्याची अनुवंशिक व भौतिक शुद्धता याची माहिती अभ्यासायला हवी. काहीवेळा ही सारी माहिती दिलेली असते. मात्र प्रमाणिकरण कोणी केले? त्या अधिकाऱयाची सही नसते. दरम्यान प्रमाणिकरणाखाली संबंधित अधिकाऱयाची सही आणि त्याची मोहोर म्हणजेच शिक्का असणे अनिवार्य आहे. बऱयाचदा काही बनावट कंपन्या इतर बियाणांचे प्रमाणिकरण छापतात. मात्र सही नसल्यामुळे ते प्रमाणिकरण झालेले नसून माहिती बनावट आहे? हे लक्षात येते. याकडे लक्ष द्यायला हवे.
हवामानाचा अंदाज घ्यावा
पेरणीपूर्वी आणि बियाणे निवडताना शेतकऱयांनी आपल्या जमिनीचा पोत व हवामानाचा अंदाज घ्यावा, असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. पेरणी करताना जमिनीमध्ये ओलाव्याची स्थिती बियाणे उगविण्यासाठी लागते. यामुळेच योग्यरित्या उगवण होऊन उत्पादन क्षमतेत वाढ होऊ शकते. पेरणी करताना निर्धारित केलेल्या वेळेतच झाल्यास तसेच पेरणीतील अंतर, खतांची मात्रा आणि पेरणीची पद्धत योग्यरित्या झाल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते, याची माहितीही शेतकऱयांनी करून घेण्याची गरज आहे.
वातावरणातील बदलाचा विचार करून शेतकऱयांनी बियाणांची निवड करावी
बियाणे दोषमुक्त असल्याची ओळख शेतकऱयाला करता येते. ती खरेदी करताना टॅगवर प्रमाणित केलेल्या माहितीयोग्य बियाणांची गुणवत्ता नसेल तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. उत्पादन क्षमता पोषक जमिनीमध्ये पेरल्यानंतर खूपच कमी आल्यास त्याची सदोषता उघड होते. बियाणांच्या पिशवीत बरोबरीनेच केरकचरा किवा तणाचे बी जास्त असल्यास त्यालाही फसवणूक असेच संबोधले जाते. उत्पादन आल्यानंतर रोपांच्या आकाराबद्दल तफावत किवा उत्पादनात फेरफार आणि विविधता आढळल्यास ती बियाणे अनुवंशिकदृष्टय़ा शुद्ध नाहीत, असे म्हणता येते. वातावरणातील बदलाचा विचार करून शेतकऱयांना बियाणांची निवड करावी लागते.